इर्शाळगड
इर्शाळगडाच्या पायथ्याशी
नांदत होते एक गांव,
क्षणात झाले भुईसपाट
इर्शाळवाडी त्याचं नाव...
चिल्ल्यां पिल्ल्यांचा तो आवाज
अचानक दबला गेला,
गोठ्यातच अंत झाला...
हंबरणाऱ्या जनावरांचा
जीता जागता माणूस
जमिनीत गाडून मेला,
रक्ताच्याच पावसाने
रक्ताचा चिखल झाला...
असा कसा हा निसर्ग
गावावर होता कोपला,
हुंदक्यात अडकला श्वास
चहूकडे फक्त चिखलच सोडून गेला...
माळीन, तळीये नंतर आता इर्शाळवाडी
अजुन किती नाहक बळी जाणार ??
का समजत नाही मानवाला,
की तो सुद्धा असाच वागणार...
निसर्गाच्या विरुद्ध वागलो
की तो सुद्धा असच विरुद्ध जाणार...
