Showing posts with label स्वतंत्र. Show all posts
Showing posts with label स्वतंत्र. Show all posts

Sunday, July 30, 2023

थोडसं रिलेशनशिपबद्दल.

 "थोडसं रिलेशनशिपबद्दल.."



सध्याच्या तरुणाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो मानसिक त्रासाचा सुध्दा विषय होत चालला आहे. "एखाद्या मुलाच्या आयुष्यात असलेली ती किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात असलेला तो" याही पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे आपण विसरूनच जात आहोत.


प्रेम हे जरी चेहरा पाहून होत असलं तरीही ते टिकतं मात्र चांगल्या स्वभावामुळे व एकमेकांचा एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळे. सुरुवातीला एकमेकांचे स्वभावगुण माहित नसल्यामुळे नात आनंदात राहत; परंतू काही दिवसांनी जेव्हा एकमेकांचे गुण, सवयी अशा एक एक गोष्टी माहित व्हायला लागतात, तेंव्हा नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात होते. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आपण त्या व्यक्तीवर जरा जास्तच अधिकार गाजवायला लागतो. तिने आपण जसं म्हणतो अगदी तसचं वागायला पाहिजे. असं आपल्याला वाटतं. आणि इथूनच खर नातं बिघडायला सुरुवात होते. अशा स्वभावामुळे नात्यांमधील जीवंतपणा कमी होतो; कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र असते. आपल्यावर अधिकार गाजवणे हे कोणालाच आवडत नसते.


यांपुढे जर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढपण अडकून पडू नका, की ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला आपलं जगणच नकोसं वाटेल. त्यांपेक्षा एकाच व्यक्तीवर एवढं प्रेम करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करायला शिकूया. आपल्याला आजपासून प्रेमाची व्याप्ती वाढवायला शिकायचं आहे. तसेच आयुष्य हा एक प्रवास आहे ज्या व्यक्तीचं स्टेशन आलं तो व्यक्ती उतरणारच आहे भलेही तो व्यक्ती कितीही आवडत असला तरीही.म्हणूनच जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर एवढं पण वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वतंत्र आयुष्य आहे. हे मान्य करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया.



✍️वसुधा इंगळे

Sunday, April 30, 2023

स्त्रीला काय हव असतं

 सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित.       

"स्त्रीला काय हव असतं?? "


एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


 प्रश्न असा होता, की ... स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजा, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."

राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली. विद्वान बराच फिरला, 

अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली, पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, "दूर जंगलात एक हडळ राहाते ती नक्की सांगू शकेल ...या प्रश्नाचं उत्तर."

विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. हडळ म्हणाली ...

 "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."

विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

तर जीव राजाच्या हातून जाणारच आहे,  म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला होकार दिला. 

लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली, "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता निर्णय घेतला आहे की ...१२ तास ... मी हडळ आणि १२ तास सुंदर परी होऊन राहीन.

आता तुम्ही मला सांगा ...दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?विद्वानांनं विचार केला ... जर ही दिवसा हडळ झाली,तर दिवस सरणार नाही, आणि रात्री झाली तर रात्र सरणार नाही . शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

"जेव्हा तुला वाटेल तेव्हा परी हो, जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो. त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, त्यामुळे मी नेहमीसाठीच परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


स्त्रीला नेहमी ....आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.जर स्त्रीला ....तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽  परी होऊन राहिल, नाहीतर हडळ.  👈🏽

◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

◆  खुशीही तुमचीच आहे  ◆सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷

आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

 कुणाच्या घरी परी आहे ?

              

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...