Hiii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण मस्तच गेला असेल अशी आशा करते. जेव्हा आपण स्वतःला आरशात बघायला जातो आणि तेव्हा जर तो आरसा स्वच्छ नसेल तर आपण त्यामध्ये स्वतःला नीट नाही बघू शकत.आपल्याला जर स्वतःचे रूप आरशामध्ये clear बघायचे असेल तर आरसा पुसावा लागेल. हे तर झाल आरशाचे पण आपल्या सगळ्यांमध्ये खूप सारे गुण असतात. प्रत्येक जण हुशार असते, प्रत्येक जण जिद्दी असते, प्रत्येक जण सहनशील, धाडशी, कर्तृत्ववान असते.मात्र हे सगळे गुण कुठेतरी धूळ खात आपल्या सगळ्याच्या आतमध्ये दडलेले असतात. जसे आसरा पुसला की आपण clear दिसायला लागतो. तसेच आपल्यामध्ये दडलेले गुण बाहेर काढले, त्यावर बसलेली धूळ बाहेर काढली की आपल्याला आयुष्याची clarity येते आणि त्यामुळे आपण जे ठरवले आहे ते नक्कीच पूर्ण करू शकतो. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye
✍️वसुधा इंगळे.
