Monday, July 31, 2023

Mental peace

 Mental peace



सकाळी लवकर उठायला कोणालाच आवडत नाही. 

सकाळी आपण लवकर उठतो ते आपल्या responsibility मुळे,मग त्या कामाच्या असतात, टेंशन च्या असतात, घरच्यांच्या असतात, पैशांच्या असतात. 


पण आपण या life च्या race मध्ये इतके धावत जात आहे की, mental peace नावाची गोष्ट आहे हेच विसरतो.जरा pause घ्या, मोठा श्वास घ्या, mental peace नावाची गोष्ट आहे हे विसरू नका. 


आयुष्य खूप सुंदर आहे. जरा आजूबाजूला बघा, फक्त काम, काम, काम हे solution नाही आहे.


सगळ्यांना सगळं achieve करायचं आहे, पण mental peace पण खूप महत्त्वाचा आहे. वेळ परत नाही येत, पैसा परत कमवू शकतोस.


✍️वसुधा इंगळे

Sunday, July 30, 2023

थोडसं रिलेशनशिपबद्दल.

 "थोडसं रिलेशनशिपबद्दल.."



सध्याच्या तरुणाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो मानसिक त्रासाचा सुध्दा विषय होत चालला आहे. "एखाद्या मुलाच्या आयुष्यात असलेली ती किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात असलेला तो" याही पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे आपण विसरूनच जात आहोत.


प्रेम हे जरी चेहरा पाहून होत असलं तरीही ते टिकतं मात्र चांगल्या स्वभावामुळे व एकमेकांचा एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळे. सुरुवातीला एकमेकांचे स्वभावगुण माहित नसल्यामुळे नात आनंदात राहत; परंतू काही दिवसांनी जेव्हा एकमेकांचे गुण, सवयी अशा एक एक गोष्टी माहित व्हायला लागतात, तेंव्हा नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात होते. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आपण त्या व्यक्तीवर जरा जास्तच अधिकार गाजवायला लागतो. तिने आपण जसं म्हणतो अगदी तसचं वागायला पाहिजे. असं आपल्याला वाटतं. आणि इथूनच खर नातं बिघडायला सुरुवात होते. अशा स्वभावामुळे नात्यांमधील जीवंतपणा कमी होतो; कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र असते. आपल्यावर अधिकार गाजवणे हे कोणालाच आवडत नसते.


यांपुढे जर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढपण अडकून पडू नका, की ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला आपलं जगणच नकोसं वाटेल. त्यांपेक्षा एकाच व्यक्तीवर एवढं प्रेम करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करायला शिकूया. आपल्याला आजपासून प्रेमाची व्याप्ती वाढवायला शिकायचं आहे. तसेच आयुष्य हा एक प्रवास आहे ज्या व्यक्तीचं स्टेशन आलं तो व्यक्ती उतरणारच आहे भलेही तो व्यक्ती कितीही आवडत असला तरीही.म्हणूनच जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर एवढं पण वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वतंत्र आयुष्य आहे. हे मान्य करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया.



✍️वसुधा इंगळे

Thursday, July 27, 2023

आपण आपल्या कमतरता शोधून, त्या दूर करूया

 आपण आपल्या कमतरता शोधून, त्या दूर करूया


एखादी मर्सिडीज कार असेल किंवा आणख दुसरं कोणतही वाहन असेल या वाहनांच्या टायरमध्ये जर काटा असेल किंवा खिळा असेल तर आपण ते असच टायरमध्ये ठेवून पुढील प्रवास करू शकत नाही. तो खिळा किंवा काटा आपल्याला काढावा लागतो. मग ती गाडी कोणतीही असो. तसेच आपल्या पायात सुध्दा काटा असेल तर आपण कितीही गडबडीत असलो तरीही आपल्याला तो काटा वेळ देऊन काढावाच लागतो तरच आपला पुढील प्रवास सुखकर होतो.


अगदी याचप्रमाणे आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असु. ते स्पर्धा परीक्षेच क्षेत्र असेल किंवा व्यवसायाचं क्षेत्र असेल यांमध्ये आपल्याला आपल्या कमतरता शोधून त्या कशा दूर करता येतील हे पाहावे लागेल. आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. यात काहीही चुकीच किंवा वाईट वाटून घेण्यासारखं नाही. परंतू आपण आपल्या कमतरता काय आहेत हे न शोधणे किंवा त्या कमतरता लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच चुकीच आहे.


आपल्यातील प्रत्येकालाच मोठं होण्याची, महान बनण्याची इच्छा आहे परंतु प्रत्येकजण महान बनत नाही कारण महान बनण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात. आपल्या कमतरता शोधून त्या दुर करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न प्रत्येक व्यक्ती घेत नाही. मी एक वाक्य वाचलं होत ते म्हणजे, जर ध्येयाच्या प्रवासाला एक हजार व्यक्ती निघाले तर त्यामधील  एकच तो ध्येयाचा प्रवास पूर्ण करतो बाकीचे उरलेले सर्व जण कुठ ना कुठ अडकून पडतात. एखादा अडथळा येतो किंवा कोणाला तरी अशा गोष्टीचा मोह होतो आणि हा मोहच त्याला ध्येयापासून बाजूला घेऊन जातो.


आपल्यातील प्रत्येकाला आज हे शोधावं लागेल की माझ्या ध्येयापुढे कोणते अडथळे येत आहेत, कोणत्या अशा कमतरता आहेत ज्यांमुळे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही हे शोधून प्रत्येक कमतरता कशी दूर करता येईल यांसाठी प्रयत्न करावे लागतील


✍️वसुधा इंगळे

Wednesday, July 26, 2023

प्रेम आणि काळजी

 प्रेम आणि काळजी

काळजात जर प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतुन व्यक्त होत असत.... पण अति काळजी आणि अति प्रेम हे दोन्हीही वाईट असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं का साखर गोड आहे म्हणून चहा मध्ये कपभर टाकत नाही किंवा मिठाशिवाय चव नाही म्हणून मुठभर मीठ टाकत नाही. त्याच पद्धतीने काळजी आणि प्रेम हे लिमिटमध्ये असेल तरच त्याचा आनंद मिळतो अन्यथा त्याचा त्रास होतो.. अगदी तुमच्या रक्ता मासाचे जरी नाते असले तरीसुद्धा प्रत्येकाचे आपले वेगळे विश्व असते प्रत्येकाला त्याची स्पेस हा द्यायलाच हवी....

      अर्थात ती स्पेस एवढिही नको की त्यात कसलीच माया भावना नाही थोडक्यात, काय तर प्रत्येक गोष्ट की बॅलन्स असण गरजेचे आहे... 

      प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात....माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते..... पण सातत्याने तोच सुवास डोकेदुखीला ही कारणीभूत ठरतो.... म्हणूनच लक्षात ठेवा " अती " कोणतीही गोष्ट नसावी...


✍️वसुधा इंगळे

इग्नोर

 इग्नोर


जी व्यक्ती तुमच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.

 अशा व्यक्तीला कधीच ignore करु नका, किंवा त्याच्याशी वाईट वागून त्याला गमवू नका. 

कारण जीवनात वेळ काढून बोलणारे लोक तुम्हाला खूप भेटतील, पण तुमच्याशी बोलण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसणारे मोजकेच असतात.

✍️वसुधा इंगळे

Monday, July 24, 2023

इर्शाळगड

इर्शाळगड



 इर्शाळगडाच्या पायथ्याशी

 नांदत होते एक गांव, 

क्षणात झाले भुईसपाट 

इर्शाळवाडी त्याचं नाव...


चिल्ल्यां पिल्ल्यांचा तो आवाज 

अचानक दबला गेला, 

गोठ्यातच अंत झाला...

हंबरणाऱ्या जनावरांचा


जीता जागता माणूस 

जमिनीत गाडून मेला, 

रक्ताच्याच पावसाने 

रक्ताचा चिखल झाला...


असा कसा हा निसर्ग

गावावर होता कोपला,

हुंदक्यात अडकला श्वास 

चहूकडे फक्त चिखलच सोडून गेला...


माळीन, तळीये नंतर आता इर्शाळवाडी 

अजुन किती नाहक बळी जाणार ?? 

का समजत नाही मानवाला, 

की तो सुद्धा असाच वागणार...

निसर्गाच्या विरुद्ध वागलो

की तो सुद्धा असच विरुद्ध जाणार...


Sunday, July 23, 2023

माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका

 माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका


जीवन जगत असतांना आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. त्यामधून काही निघून जातात, काही माणसे आपल्यासोबत जोडले जातात. काही माणसांचा सहवास आपल्याला आवडायला लागतो कारण सहवासाने आवड निर्माण होत असते आणि मग आपण कधी त्या व्यक्तीमध्ये गुंतलो हेच आपल्या लक्षात येत नाही.


आपण ज्यावेळी त्या व्यक्तीमध्ये गुंततो तेंव्हा आपण त्या व्यक्तींवर खूप जास्त अधिकार दाखवत राहतो. मग ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, तेंव्हा या गोष्टीचा खूप जास्त मानसिक त्रास हा आपल्याला सहन करावा लागतो. काही गरज नसतांना विनाकारण आपल्यावर दुःखी राहण्याची वेळ येते. या सर्व गोष्टी आपण खूप जास्त माणसामध्ये गुंततो त्यामुळेच घडतात. आजपासून एखादया व्यक्तीसोबत एवढं पण अटैचमेंट नका ठेवू की, ती व्यक्ती थोडं वेगळी वागली किंवा तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागेल.



आपल्याला जर यापुढील आयुष्य अगदी आनंदाने, समाधानाने जगायचे असेल तर आपण आपली ऊर्जा ही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरूया. म्हणजेच आपण आपलं हे आयुष्य एखादया कामात व्यस्त ठेवा आणि मग ते 'काम' पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दयायचं. मग आपल्याला हे पाहण्यासाठी वेळच नाही मिळणार की, कोणं काय करत आहे किंवा हा व्यक्ती असा का वागत आहे?.


आपला खरा प्रॉब्लेम झालाय कुठे तर आपण आपलं आयुष्य हे काही ठराविकच लोकांसोबत बांधून घेतलं आहे त्यामुळे ते लोकं थोडं जरी आपल्या मनाविरुद्ध वागले तर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपले अनेक दिवस याच गोष्टीमुळे दुःखात जात आहेत. 


मित्रांनो, आपलं आयुष्य हे अनिश्चित आहे. आपल्या आयुष्यात काय घडले पाहिजे हेच आपल्या हातात नाही. तिथं कुठ आपण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल विचार करून स्वत: ला त्रास करून घ्यायचा. त्यांपेक्षा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्यानं कसं वागलं पाहिजे याचं त्याला स्वातंत्र्य आहे. विनाकारण त्यांच्यामध्ये गुंतून पडायचं नाही.


✍️वसुधा इंगळे

Saturday, July 22, 2023

एक कटुसत्य

 एक कटुसत्य....

माझ्या पोस्टला इतक्या लाईक येतात,

अमुक-अमुक माझे स्टेटस बघतो,

तमूक-तमूक मला नावाने ओळखतो,

फलाना माझे फोन उचलतो,

डीमका मला मेस्सेज करतो,

मी त्यांच्या किचन मध्ये जाते,

मी यांच्या गाडीत फिरते,

याला काही ही अर्थ नाही मित्रांनो.

"खिशात असेल मनी तरचं विचारतात बरं हाय का धनी"

हा कार्यक्रमच तेवढा खरा आहे...

नाहीतर 

बाकी सब मोह माया है !! 

सोशल मीडियावर 30 लाईक नसल्या तरी चालेल पण खात्यात 30 लाख पडलेले पाहिजेत.

केव्हाही खर्च करता येतात.

पैसे देऊन लाईक वाढवता ही येतात पण लाईक दाखवून किराणा फुकट मिळत नाही.



Thursday, July 20, 2023

सहज मनात आलेलं

 सहज मनात आलेलं


पावसाळा चालू झाला म्हणून म्हटलं वॉटरफॉल ची सहल तर झालीच पाहिजे. मागच्या आठवड्यात नेरळ ला गेलो होतो. तिकडून माथेरान च्या वॉटरफॉल ला भेट दिली.  माथेरान चा वळणावळणाचा रास्ता, तिकडून जस जसे वर जाऊ तस खूपच उंच अशा टेकडी वर आल्यासारखे वाटत होतं. उंच असल्यामुळे तिथे शुद्ध हवा होती त्यांमुळे मन अगदी प्रसन्न होत होतं. शुद्ध हवेमुळे मनातील बरेचसे नकारात्मक विचार आपोआप कमी होत होते व मन प्रफुल्लित होत होतं.


थोड्या वेळाने मी थोड्या उंच अशा दगडावर शांत बसण्या- साठी गेले आजूबाजूला देखील छोटे छोटे दगड होते. त्यांचं थोडं निरीक्षण मी करत होते. त्या उंच टेकडीवरून ज्यांवेळी माझी नजर टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या माणसांकडे गेली त्या टेकडीवरून ती सर्व माणसं खूप लहान लहान दिसत होती.


मी शांत बसून माझ्या मनात येणाच्या विचारांचं निरीक्षण करत होते, त्यांवेळी माझ्या मनात त्या टेकडीवरून निरीक्षण करतांना एक गोष्ट लक्षात आली की, आपण ज्या विश्वात आहोत ते विश्वसुद्धा अतिविशाल आहे. कितीतरी आकाशगंगा था विश्वात आहेत त्यामध्ये कितीतरी ग्रह आहेत त्यात आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर कितीतरी प्रजाती आहेत त्यात आपणही एक आहोत. मग या एवढ्या मोठ्या विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्त्व पाहिलं तर ते मुंगीपेक्षासुध्दा कितीतरी छोट आहे; परंतू आपल्याला याची जाणीवच नाहीये. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींच दुःख, ओझं घेऊन जगत आहोत. आपल्याला कोणी मान-सन्मान दिला नाही तर आपल्याला दुःख होतं, राग येतो, आपला कोणी अपमान केला तर आपण तो कितीतरी दिवस लक्षात ठेवतो, मी उगाच कोणीतरी मोठा आहे हा अहंकार ठेवून जगत राहतो व दुःखी होतो, अपयश वाट्याला आलं की त्याचाही ताणतणाव येत राहतो मग अशा कितीतरी असंख्य गोष्टींच ओझं घेऊन आपण जगत आहोत.


या विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्व खरंच छोटं आहे म्हणून "मी कोणीच नाही" हा भाव ठेवून आपण काम करत राहुया...आपल्याला कोणत्याच गोष्टींच ओझं घेऊन आयुष्य जगायचं नाहीये, ते ओझं आज या क्षणाला उतरून टाकूया. मग पाहा मन हलकं होईल; कारण नको त्या अनेक गोष्टींना आपण कवटाळून बसलो आहोत, त्याचा आपल्याला त्रास होतो आपण अस्वस्थ होतो, तरीही आपण काही गोष्टी सोडायला तयार नाही. आज मात्र आपण या सर्व गोष्टी सोडून देऊन एक सुंदर आयुष्य जगूया. 


✍️वसुधा इंगळे

Monday, July 17, 2023

जास्त ऐकावं... कमी बोलावं

 जास्त ऐकावं... कमी बोलावं


      हे ज्याला जमतं तो बरच काही साध्य करु शकतो.. जिथे गरज नाही तिथे व्यक्त होवु नये हेच योग्य..

      आताच यूट्यूबवर शिवानी  यांना ऐकत होते.. त्या खूपच सुंदर बोलतात .. वेळ मिळेल तसं मी अनेकांना ऐकते.. ओशोना ऐकते.. जया कुमारी खुप जण खुप छान बोलतात.. किवा पुस्तक वाचन सतत सुरु असतं..जे मिळेल ते मी वेळ मिळेल तस वाचत असते. मला माझा वेळ वाया गेलेला आवडत नाही.. दंगा करताना फक्त दंगा आणि आणि इतर कामाच्या वेळी काम असत..

      आज शीवानी बोलत होत्या तो विषय तुमच्याशी शेअर करावा वाटला.. त्यांचं म्हणणं होतं की , एखाद्याबद्दल आपल्या मनात आलेले वाईट विचार हे त्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्या व्यक्तीला तिकडे लो फील होतं.. आणि त्याचं पाप आपल्याला लागतं.. मी विपश्यना करत असल्यामुळे मला अस वाटत की प्रत्येकाच्या आत एकच परमात्मा वास करतो त्यामुळे कदाचित आपले चांगले वाईट विचार समोरच्यापर्यंत पोचत असावेत.. 

      काही जणाना हा विचार पटणार नाही पण मी प्रचंड पॉजीटीव्ह आहे त्या मागे माझ्या पती चा हाथ आहे असं मी मानते. आणि एखाद्या घटनेकडे किवा परिस्थितीकडे चांगल्याच नजरेने पहाण्याची सवय असल्याने मी विचार केला की शीवानीजी बोलतात ते खरं मानु म्हणजेच माझ्या मनात कधीच कोणाबद्दल काहीच वाईट येणार नाही..याचाच अर्थ मी माझ्या वाचकाना सांगेन असं जर खरच असं  होत असेल तर आपण सोशल मिडीयावर कोणावर व्यक्त होताना काय पध्दतीने व्यक्त व्हायला हवं याचा जरुर विचार करावा..कारण अनेकदा अनेक लोकांवर वाचु नये इतक्या वाईट कमेंट करत असतात आतापासुन शिवानीजी सांगतात तो विचार फॉलो करायला काहीच हरकत नाही..  कधीही कोणाकडून चांगलच घ्यावं.. चांगलच पहावं आणि चांगलच बोलावं..


    If you change your vision and thoughts

        Automatically whole world will change..


निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हीटीच पसरवते..यामुळे या क्षणापासून पाऊल उचलताना आणि व्यक्त होताना आपण जरुर विचार करायला हरकत नाही..  त्यामुळे कमी बोला आणि जास्त ऐका.. 🌹


✍️वसुधा इंगळे

Saturday, July 15, 2023

अभिनंदन

 अभिनंदन



एकच गोष्ट " मेहनत". आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर माणूस जग जिंकू शकतो. 


मेहनत करण्याची तयारी आणि आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या माणसांची साथ असेल तर केलेल्या कामातून समाधान मिळतेच.... एक नवीन ऊर्जा तयार होते. येणाऱ्या काळात आणखी चांगली कामं करण्याची इच्छा निर्माण होते.


आयुष्यात काही स्वप्नं आपल्या अगोदर आपले आई-वडील पाहत असतात. तुमच्यासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुम्हाला पुर्ण करायचे आहे. त्यातले हे एक खरतरं....


आयुष्य जगत असताना भेटणारी माणसं अनेक असतात पण कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाच्या सोबत राहायचे हे त्या माणसाच्या विचारावर, स्वभावावर आणि मेहनतीवर ठरत असते. नरेंद्र इंगळे त्यातलेच एक नाव. ज्याच्या सोबत उभं राहताना आनंद होतो आणि ज्याचा अभिमान ही वाटतो. आज घरच्यांना, मला, तुमच्या मित्र मैत्रिणी ना तुमच्यासाठी आनंदी झालेलं  पाहून मी समाधानी झाले. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.....


✍️वसुधा इंगळे

Move On

 Move On


वेळ निघून जाते पण आठवणी मागे राहतात. भूतकाळातल्या काही गोष्टी तुम्हाला सतत मागे खेचतात, move on होण्यापासून रोखतात. या गोष्टी सोडून द्यायला शिकणं महत्वाचं आहे, आयुष्य वर्तमानात जगणं आवश्यक आहे. 

✍️वसुधा इंगळे

Wednesday, July 12, 2023

आठवणी

 आठवणी

आठवणी या अशाच असतात. सिगारेटच्या झुरक्यासारख्या मनात ओढून घ्यायच्या, पण तशाच वाऱ्यासोबत सोडून द्यायच्या. 

काही आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात, तर काही हवेत विरून जातात. कोणाला मनात ठेवायच आणि कोणाला सोडून द्यायचं हे मात्र आपल्या हातात नसतं. 

ती त्या आठवणीमागची भावनिक तीव्रता ठरवत असते. आपण फक्त माध्यम व्हायचं.

✍️वसुधा इंगळे

Monday, July 10, 2023

आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.

 आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.



पाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत. त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत असतात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून वेगळे किंवा विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपन पृथ्वी ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.
माझा आसपास चा समाज पाहते, तेव्हा स्वत: हाला शोधात नाही. त्यांना काय अपेक्षित आहे, हे ओळखताना मला 'मी' काय हवंय याचा शोध घेत नाही, त्याची कल्पना पण करत नाही, एकाग्र होत नाही. काळावर स्वार होऊन जगण्याचा विचार करत नाही. विचार विश्व पातळीवर जात नाही. मनाचं परीघं आकाशगंगा काही सेकंदात पार करू शकतं. पण त्याला कल्पनेच्या मर्यादेत सामवून ठेवतं. बुद्धी आणि मनाची सांगड घालणं सोडून फ़क़्त बुद्धीचे ऐकूण दोघांत युद्ध लावून स्वत:ची फरपट करून घेतो. मनाचे श्लोक विसरून बुद्धीचे व्यवहार्य चातूर्याचे गोडवे गातो. मन मारतो, पिळवटतो, आणि बुद्धीवर स्वार होऊन जग जिंकायला निघतो. पण समजत नाही, बुद्धी ही मनाची रसद आहे. तिला कोमेजून शरीरात कुठलाच भाग स्थिर राहत नाही. बुद्धी काम करेनाशी होते. मग उंच उडणारा घोडा अगदी खोल जातो, ढासळतो, मनोरे पडतात. पर्यायी व्यक्तीमत्व, व्यक्ती खंगत जाते. अकार्यक्षम होते, निस्तेज होते.
मला या जगात माझ्या मनाच्या पातळीवर मुक्त विहार करायला पाठवलं आहे. मुक्त जगायला, बागडायला. बंधणाच जाळ करून त्यात अडकायला नाही. तर ते सोडवून, त्याची वीण जाणून मुक्त जगायला . .! 

तात्पर्य :- कधी कधी आपण आपल्याच्या जवळच्या व्यक्ती बद्दल काही विशिष्ट समज करून घेतो. (चांगले किंवा वाईट)
आणि आपल्याला वाटत आपण त्यांना खूप चांगलं ओळखतो हे गृहीत धरतो. आणि नेमक्या वेळी हीच जवळची माणस कच खातात. आणि आपला पुरता हिरमोड होतो. त्याचप्रेमाने मुक्त जगण्यासाठी देखील ह्याच जवळच्या व्यक्ती चा कुठे तरी मनाच्या खोल कप्यात विचार चालू असतो. की आज आपण फिरायला जाऊया अस आपण गृहीत धरतो, पण समोरची व्यक्ती अरसिक आहे हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण असा विचार करतो की ती येईल.
म्हणून च ही जी वीण आहे आपलेपानाची, समाजाची ती थोडी सैल करून आपण स्वतःच आनंद शोधला पाहिजे.

✍️वसुधा इंगळे.

Friday, July 7, 2023

व पु काळे

 

बायकांची जात' असं म्हणत जन्माला येताक्षणी, काही बायका जणु काही आपल्याला काय काय वर्ज्य ते ठरवतात. आणि निम्मं जगणं कायमचं नाकारतात. राह्यलेलं निम्मं आयुष्य कसं जगायचं, हे समाज बाईवर लादत असतो. त्यातलाही खुप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो.

बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरुन शंखात कोंडुन घेतो. आणि मन तर मारण्यासाठीच असतं. ते तर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखावरचा वर्ख गळायच्या आतच संपलेलं असतं. गरूडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त. तरीही, ते मन मेलं की जगण सोपं. पण ते जर फिनिक्स पक्ष्यासारखं असलं तर संपलं. मग 'तडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे' अशी फक्त तडफड.....


✍️व पु काळे

स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आनंदात राहाल...

स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आनंदात राहाल...


घार उंच उडते म्हणून चिमणीला

कधी टेन्शन येत नाही, 

की वाईट वाटत नाही.

ती तिचं आयुष्य आनंदात जगत असते. 

पण एक माणूस मोठा झालेला पाहून 

दुसऱ्याला लगेच वाईट वाटते, 

मत्सर निर्माण होतो.


✍️वसुधा इंगळे

ज्ञान

 ज्ञान


कोणत्याही गोष्टीचं ज्ञान कधीही वाया जातं नसतं. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान असने हे अज्ञान असण्यापेक्षा चांगलं असतं नेहमीच. प्रामाणिकपणे केलेला अभ्यास व घेतलेली मेहनत कधीही वाया जात नाही.  त्याचा मोबदला योग्य त्या वेळी व्यक्तीला मिळतोच. माणसाने आपल्याला जमेल ती प्रत्येक गोष्ट शिकायला हवी किंवा शिकायचा प्रयत्न तरी करायला हवा. स्वयंपाकापासून तर आणीबाणीत गाडीचं टायर बदलण्यापर्यत माणसाला सर्वकाही थोडंफार जमायला हवं. मला हे अजिबात माहित नाही किंवा मला हे जमतंच नाही, म्हणण्यापेक्षा त्याबद्दल थोडंफार तरी माहित असणे हे योग्य असते.

✍️वसुधा इंगळे

Sunday, July 2, 2023

माणुसकी

 माणुसकी

दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, 

आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...