Saturday, February 25, 2023

बायकांची बुद्धिमत्ता

बायकांची बुद्धिमत्ता


बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी - भाजी - वरण - भात - कोशिंबीर - चटणी - उसळ वगैरे वगैरे, तसेच लाडू - चिवडे - मिठाया - पक्वान्न वगैरे वगैरे बनत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं? गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी - जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 

- पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

- एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

- ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

- प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

- दूध तापत असताना, कुकर मध्ये डाळ शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा गदागदा हलवून येणे हा (मला अस उठवाव लागत काम करत असताना ) वेळेचा हिशोब कसा करायचा?

- मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

- पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?

- उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

- वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे.

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, प्रसंगी पूर्ण अशिक्षित असुन स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकाच्या  हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?

 निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. 

किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.🌿🌾


✍️वसुधा इंगळे

Tuesday, February 21, 2023

सुधांशु मनी

 सुधांशु मनी




सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.

रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे पेशाने इंजीनियर होते. त्यांच्या रिटायरमेंट ला केवळ  दोन वर्षे  बाकी होते.

सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे.

पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी  कि कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.

ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?

ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.

ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनी च्या डब्यांची चाचणी सुरू होती.

चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५०कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा रही करारही करत नव्हती.

अशा परिस्थितीत या इंजीनियर ने संकल्प केला कि आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले Are You Sure, We Can Do It ?

उत्तर होते...Yes Sir!

किती पैसे लागतील R&D साठी ? फक्त १०० कोटी रु सर!

रेल्वे ने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. 

दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर  जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ट्रेन १८ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो. आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला?

केवळ ९७ कोटी! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.

ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हीरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे कि या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच  'सेल्फ प्रोपेल्ड' आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.

या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे , "सुधांशु मनी"


✍️ वसुधा इंगळे

Tuesday, February 14, 2023

शिक्षण

 शिक्षण


आपली वागणूक ही प्रत्येकासोबत समान असायला हवी... कोणासोबतही कोणत्याही बाबतीत भेदभाव नसायला हवा... आपण जर शिकून सवरून एखाद्याला त्याच्या कपडे, शिक्षण, बॅकग्राऊंड आणि इतर काही गोष्टीवरून Judge करत असू तर आपल्या त्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही. शिक्षण तुम्हाला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देतो, प्रत्येकाला समान नजरेने बघायला शिकवत असत. आणि जर शिक्षणच तुम्हाला द्वेष, भेदभाव आणि विषमता शिकवत असेल तर, मग ते शिक्षण काय कामाच...!!!

✍️वसुधा इंगळे

Monday, February 13, 2023

योगदान फाऊंडेशन

योगदान फाऊंडेशन





शेतकरी आणि पक्षी यांचे जवळपास जवळचे नाते  शेतामध्ये कीड नियंत्रण राखण्यासाठी निसर्ग मार्फत पक्ष्यांची मोठी मदत मिळते.

भारतीय उपखंडात जवळपास तीस हजार प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारची वनस्पती जिवंत राहणार नाही अनेक कीटक (अळ्या) दिवसातून दोन वेळा त्यांच्या वजना इतकेच अन्नग्रहण करतात. कोवळी पाने खाणाऱ्या आळ्या 24 तासात त्यांच्या वजनाच्या 200 पट अन्न खातात. टोळ ज्याप्रमाणे त्यांच्या खाण्याच्या असाधारण पणासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ते मुबलक प्रजोत्पादनासाठी   प्रसिद्ध आहे त्यांचा गट कधीकधी इतका मोठा असतो की तो काही तासातच एका बहादार झाडांचे रूपांतर निरूपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो. मादी टोळी जमिनीमध्ये एका  कोषात साधारणपणे शंभर अंडी घालते तर एक मादी अनेक कोष तयार करते.


कीटकांचे हे वाढते प्रमाण आणि अन्नरुपात  वनस्पती भक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता कीटकांची संख्या एका विशिष्ट / ठराविक प्रमाणात नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि पक्ष्या मार्फत हे काम निसर्गात केले जाते . सामान्यपणे वनस्पती साठी विशेषत: शेतातील पिकासाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांचा समावेश पक्षांच्या अन्नामध्ये होतं त्यामुळे अनेक प्रजातीचे पक्षी फक्त किटकांनाच खात नाहीत तर त्यांची अंडी ही मोठया प्रमाणावर फस्त करतात त्यामुळे वेगवेगळया अवस्थेतील कीटक उदा . अंडी ,अळी ,कोष पूर्ण कीटक पक्ष्यांकडून खाल्ले जाते.

दरवर्षी हिवाळ्यात कीटकांची एक नवीन पिढी तयार होत असते भोरड्या आणि मैना हे पक्षी त्याच ऋतूमध्ये हिमालयातून लाखोंच्या संख्येने देशातील वेगवेगळ्या भागात येतात आणि ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांना घातक ठरणाऱ्या कीटकाच्या टोळ्या आणि आळ्या खाऊन किडीपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात , किडी पासून पिकांचे  संरक्षण करणाऱ्या पक्ष्यांमध्ये कावळे, निळकंठ यासारख्या पक्षांचाही समावेश होतो . शेतीसाठी घातक असणारे कीटक, गवतातील बिया इत्यादींपासून संरक्षण करण्याचे काम प्रोढ फिंचेस व सुगरण ,चंडोल, चिमण्या, वटवटे या जातीचे पक्षी करतात.प्रोढ फिंचेस व सुगरण या जातीचे पक्षी पिकावरील आळ्या व अंडी  यांच्या पिल्लांना भरवतात तसेच शेतातील गवताच्या बिया खाऊंन ते तणांचा  वाढता प्रसार थांबवता.

पोकळ्या पवर्गातील पक्षी ही गव्हावरील कीड नियंत्रणात  महत्त्वाची भूमिका बजावतात. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पिका वर ज्या किडीचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो त्यावर हे पक्षी उदरनिर्वाह करतात . वटवटे जातीचे पक्षी ऊस पिकातील कीटक खातात.


बुश चॅट, खाटीक, कोतवाल ,वेडा राघू हे पक्षी पिकाभोवती दिवसा  वेगवेगळ्या कीटकांना खाताना आढळतात पांढरा करकोचा ,शराटी यासारखे पक्षी जमिनीत वेग वेगळे कीटक  पायाने उकरून खात असतात. 


पक्ष्यांच्या अन्नातील कीटकांचे प्रमाण पाहिल्यास असे लक्षात येते की भोरड्या ची एक जोडी 24 तासात 370 वेळा घरट्याकडे अन्न घेऊन येते त्यामध्ये  अळी, टोळ ,नाकतोडे असे विविध कीटक असतात. भोरड्या च्या घरट्यात आणल्या जाणाऱ्या अन्नाचे वजन त्या त्या भोरड्या च्या वजनाइतके असते असे निरीक्षणावरून  लक्षात आले. 


सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षी तज्ञ डॉ. डब्ल्यू इ कोलिंग यांच्या मतानुसार एक चिमणी एका दिवसात 220 ते 260 वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन येते ज्यामध्ये वेगवेगळ्यां अळ्यांचा व इतर कीटकांचा समावेश असतो.

एका जर्मन पक्षी तज्ञाने अंदाज मांडलेला आहे की टोपीवाला या पक्ष्यांची एक जोडी तिच्या पिल्ला सह एका वर्षात कमीत कमी 120 दशलक्ष कीटकांची अंडी किंवा 1लाख 50 हजार अळ्या आणि कोष नष्ट करते . यावरून असे लक्षात येते की कीटकांच्या वाढीवर व कीटकांमुळे होणाऱ्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रीत्या पक्ष्यांची मदत होते निसर्गातील अन्नसाखळीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. बिहार राज्यातील पुसा येथील अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मधील सी डब्ल्यू मॅसन आणि एच मॅक्सवेल लेफ्रॉम  कीटक शास्त्रज्ञांनी भारतातील पक्ष्यांचे अन्न या विषयावर विसाव्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले त्याच त्यांना असे आढळून आले की शेतातील पिकावर येणारे अनेक पक्षी असे आहेत की ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकावरील कीड आणि कीटक  हे आहे तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. 

घुबडांची व इतर निशाचर पक्ष्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात उंदरावर होत असते त्यामुळे गरुड, घुबड, पिंगळा यासारखे विविध शिकारी पक्षी शेतीसाठी किंबहुना शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत.शृंगी  जातीचे घुबड एका रात्रीत एक किंवा त्यापेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खात असतात. घुबडांची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळपास एक हजार कुरतडणाऱ्या प्राण्यांना खात असतात त्यामुळे घुबड शेतकऱ्यांचे खरे मदतनीस आहे.


काही वनस्पतींच्या प्रजाती साठी सूर्यपक्षी हे महत्त्वाचे पराग वाहक  आहेत आपल्या परिसरातील ज्वारी ,बाजरी ,सूर्यफूल यासारख्या फुलोरा अवस्थेत बरेच पक्षी कणसावर  बसून त्या ठिकाणी असणारे कीटक खात असतात त्या वेळी त्यांच्या वजनाने ते कणीस इतर  कणसा वरती आपटते व परागी भवन घडून येते यामध्ये सुगरण, सातभाई, वटवटे यासारखे पक्षी मोलाची मदत करतात.

पक्षी संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी ही पुढाकार घ्यावा तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पक्ष्यांसाठी पिण्याची पाण्याची सोय करावी असे योगदान फाउंडेशन च्या वतीने आव्हान करण्यात येते . निसर्गातील पक्ष्यांचे महत्त्व  सर्वांनी जाणून घ्यावे. पक्ष्यांमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो बीज प्रसार होतो आणि निसर्गाची सुंदरता राखली जाते. पक्षी संवर्धन व निसर्ग संवर्धन कार्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा.🙏🐦🐦


योगदान फाऊंडेशन

https://youtube.com/channel/UCTFOGpA6sVFKB8rGJP_HVMw


टिटवाळा.


Thursday, February 9, 2023

आपुलकीच्या माणसासाठी

 "आपुलकीच्या माणसासाठी"

*रोज तुम्ही स्वतःमध्ये 1 टक्के जरी सुधारणा केली, तरी वर्षभरात तुमच्यामध्ये 365 टक्के सुधारणा झालेली असेल.*_


एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.


_*ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते! आयुष्यात व्यवहार तर खुप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही...!*_


आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडाला ही पाण्याचा एका थेंबासाठी खाली यावे लागते. परंतु खाली येणे त्यांची हार नसते तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते.


_*यशस्वी तर भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो..*_


जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते असे काही नाही. मधुर वाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते.


_*तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते, ती म्हणजे हा आपल्यापुढे निघून जाईल. नातं कोणतही असू द्या... फक्त इमानदार असलं पाहीजे.*_


जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते! साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसं!


_*माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो... परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना...? परंतू मला वाटतं... माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं... जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..*_


प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही...!

 

Wednesday, February 8, 2023

प्रेम

 प्रेम



प्रेमाचे दिवस साजरे करून काही होत नाही , आपला जोडीदार शेवटच्या श्वासापर्यंत सोबत जपता यावा बस इतकचं .🥰❤️ सोबत वाटचाल करत आयुष्याची सांजवेळ यावी.नाते जुळले मनाशी मनाचे ,उगाच नाही जन्मलो आम्ही .फेरे आमचे गत जनमाचे, बळ मिळाले तेव्हा आम्हा संकटाशी झुंजण्याचे ,वचन दिले एकमेका जीवनभर साथ देण्याचे....कुठल प्रॉमिस,कुठला डे,कधी जाणंवलच नाही काय असत मिस यू,लव्ह यू,शेवटचा श्वासअसेपर्यंत तू माझा मी तुझी होऊ काठी आधाराची.जगू असे की मरणाला ही आव्हान देवूनी पुन्हा परतण्याची आस घेवूनी......झाली आता सांजवेळ तुझ्या माझ्या संसाराची,घेवून हात हाती चल जावू पैलथडी.......

Saturday, February 4, 2023

आता मला जमायला लागलंय

 आता मला जमायला लागलंय!


आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 

जे जे मला दुखवत गेले, त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं,

आता मला जमायला लागलयं!


संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी, वाद न घालता तेथून दूर 

निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय!


माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून, त्यात शक्ती खर्ची घालून,

आजूबाजूला जे जे उत्तम आहे, त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय

हे ही जाणवायला लागलयं!


आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत

स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आता जमायला लागलंय!


कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर

काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही!

कधी-कधी काहीही न बोलणं

किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं

खूप काही बोलून जातं,

आणि सांगूनही जातं! 

हे ही कळायला लागलंय!


आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधनं आणू शकत नाही,

पण स्वतः च्या मनावर मात्र

बांध घालू शकतो.

आपण अशा लोकांचे वागणे

किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या

आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं कां?

हे ठरवणं गरजेचं असतं

हे ही कळायला लागलयं!


कधी कधी परिस्थितीला

आहे तसच सोडून देणं,

आणि शांत राहणं सोईच ठरतं!

लोकांना कुठल्याही गोष्टीचं

स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळटपणाचं आहे हे कळल्यावर मी आता मला,

त्या दृष्टीने घडवायला लागलोय!


मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षाने शोध घेत होतो ती मन:शांती, समाधान मला मिळालं तेव्हा ठरवलं की,मी अशा लोकांपासून

लांब राहावे. ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला 

त्यांच्या साच्यात बसवणं शक्य नाही त्यांच्यापासून अंतर ठेवणं

आता मला जमायला लागलयं!


सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात.

तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणाऱ्या, वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलयं!


माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं, आणि उशीरा कां होईना पण मी आता त्या वाटेवर

समाधानानं पावलं टाकायला लागलोय! 

त्या वाटेवर स्थिर राहणं,

आता मला जमायला लागलंय!🌹🌿🌾

Wednesday, February 1, 2023

निर्णय

 तुझी गोड गोड बोलून परवानगी मिळवण्याची पद्धत मला चांगलीच ज्ञात झाली आहे ... पण ज्या गोष्टी माझ्या नजरेत वाईट असतील त्याची परवानगी तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि फक्त तुमची अडवणूक करायची म्हणून नाही, तर तूम्ही चुकूनही चुकीच्या वाटेला जाऊ नयेत किंवा अडचणीत फसू नयेत यासाठीच हा अट्टहास असेल. 


मग तिथे तुमचे अश्रूही माझ्यासाठी  फक्त त्या वेळापुरते गौण असतील. हे फक्त तुमच्यापुरतंच नाही तर घरातील प्रत्येकाला लागू होईल.. फक्त व्यक्तिपरत्वे नियम बदलत राहतील. मला स्त्रीप्रधान घर नकोय मला माझ्या पाठीमागेही माझी काळजी आणि निर्णय समजणारं प्रमाणिक कुटुंब हवंय.. स्त्री म्हणून इतकंही पुरेसं आहे माझ्यासाठी..!❤️


✍️वसुधा इंगळे

बाप

बाप

दोन पाऊलं चालल्यावरही थकणारे पाय जेव्हा वडिलांसाठी काही खास खरेदी करायला दोन तासही चालायला तयार असतात तेव्हा कळतं.. "बाप" माणूस नजरेतून आणि शब्दांतून नाही.. तर मनातून सुरू होऊन रक्तापर्यंत भिनलेला असतो..!

मच्छिन्द्र टिंगरे

वेश्या नावाची आई......

पोरानं आईला विष पाजलं, अन आईनं पोराला अमृत.....


बारामतीतं घडलेली  सत्य घटना.... संबंधिताच्या परवानगीने शेअर करतं आहे.... याबद्दल कोणाला माहिती असल्यास कोणी.. नावं, गावं, किंवा ओळख निर्माण होईल अशी कमेंट करू नये...


गेल्या महिन्याभरापासून माझ्याकडे एक मॅटर चालु होतं काल त्याचा आनंददायी शेवट झाला.... साधारण एकमहिन्यापूर्वी एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या... त्यांनी मला सांगितले साहेब पोरगं मला सोडून गेलंय मला बोलतं नाही मी एकटी राहते ... मी सगळी घटना समजून घेतली... त्या मावशीने मला जी हकीकत सांगितली ती ऐकून शहारे आले.....त्यांनी सांगितले मला एकचं मुलगा आहे.... माझ्या नवऱ्याचा मुलगा दोन वर्षाचा अपघाती मृत्यू झाला... मी सासरीच राहत होते.. काही काळ गेल्यानंतर मी एकटी असल्याचा फायदा घेत घरातल्या सहित काही पुरुषांची वाईट नजर माझ्यावर पडत होती... मी जर आयुष्यात कोणाला तरी स्थान दिल असतं तर, माझ्या मुलाच्या अन माझ्या प्रेमात अंतर पडलं असतं... माझ्या मुलाला मला काहीतरी घडवून दाखवायचं आहे...... असं चंग बांधून घरं सोडलं अन बारामतीतं रहायला आले..... काही दिवस माहेरच्या लोकांनी साथ दिली परंतू नंतर त्यांच्या अडचणीमुळे ते फारशी मदत करू शकले नाहीत....मुलाचं शिक्षण झालं ग्रॅज्युशन झाल्यावर.. त्याला एम. पी. एस.सी.चा अभ्यास करायचा होता.... मला काही लोकांनी सांगितले त्याला पुण्याला ठेवला तर चांगला अभ्यास होईल... मी काही ओळखीच्या लोकांकडून उसणवारी चे पैसे घेऊन त्याला पाठवलं....


त्या काळात त्याची परीक्षा झाली तो पास झाला... तो लिपिक म्हणून नोकरीला लागला... पण दरम्यान च्या काळात मी बारामतीत एकटी राहत होते... मुलाला माझ्याबद्दल कोणीतरी चुकीचं सांगितले.... आईला एकांत भेटावां म्हणून तुला तिने पुण्याला पाठवलं होतं असा गैरसमज त्याच्या मनात कोणीतरी भरवला.... त्याने माझ्याशी वाद घालायला सुरवात केली.... माझे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असा समज त्याच्या मनात घरं करून बसला होता.... आमचा वाद विकोपाला गेला.... मला तो तू वेश्या आहॆस असं ही म्हटला...एक दिवशी त्याने विषाची बाटली आणून आत्महत्या कर असे सांगितले......मला त्याने विष प्यायला भाग पाडलं.... पण काही लोकांनी दवाखान्यात घेऊन गेले..... तेथे पोलीस माझे जबाब घ्यायला आले.... मी खरं सांगितले असतं तर त्याचं करियर उधवस्त झालं असतं म्हणून मी पोलिसांना मीच आजरपणाला कंटाळले होती म्हणून मी विष घेतलं असं सांगितले..... आता तो नोकरीं करतोय.... लग्न ही झालयं...मला त्याच्याकडे जायचंय काही करुन त्याला समजून सांगा असं मला विनंती केली......

मी त्यांचा नंबर घेतला.... फोन केला.. मी मच्छिन्द्र टिंगरे बोलतोय.. मला तुम्हाला भेटायचं आहे... कधी भेट होईल.. तो म्हणाला सर मी तुम्हाला ओळखतो... काय कामं होत... मी त्याला म्हटलं भेटल्यावर बोलू म्हटलं... नवरा बायको दोघे या असं म्हटलं..... गेल्या आठवड्यात दोघेजण माझ्याकडे आले.. आम्ही माझ्या ऑफिस ला बसलो.... योगायोगाने त्याची पत्नी पण मला ओळखत होती.... ती मला म्हटली सर तुम्ही आमच्या शाळेत आला होता.. पर्यावरण विषयावर तुमच व्याख्यान होतं..... ती ओळखिची निघाल्यावर माझं कामं सोपं झालं...

मी तिला बाजूला घेतलं तिला म्हटलं हा जर स्वतःच्या आईवर संशय घेतोय तरी उद्या तुझं काय चुकलं तरकाय होईल..... काही तासाच्या चर्चेनंतर मुलाला स्वतःची चूक कळाली....मला काही वेळा त्याला धमकी पण द्यावी लागली... तो आईला घेऊन जायला तयार झाला तेथूनच आई त्यांच्याबरोबर मुलाकडे चालली होती..... सगळेजण बाहेर पडले आई घाई गडबडीत माघारी आली पर्स मधून पाचशेच्या काही नोटा बाहेर काढल्या अन म्हणाली सर तुमची फी घ्या.... मी हसून म्हणालो आयुष्यात खूप कामं केलीत... आज आयुष्यातील सगळ्यात चांगल कामं हातून घडलंय फी नको पण पुण्याला आल्यावर तुमच्याकडे नक्की जेवायला येईल... डोळ्याच्या कडा पानावलेली आई.... मुलाबरोबर निघून गेली... खूप समाधान वाटलं...मी एका प्रॉब्लेम सॉल केला या पेक्षा हे आई नावाचं रसायन काय असतं हे कोडं या जन्मात तरी सुटणार नाही....


मच्छिन्द्र टिंगरे बारामती...9527547547


टीप : अनेक जन माझा लेख व्हायरल करतात परंतू नावं नंबर काढल्यामुळे.. मी जर अजून कोणाला मदत करू शकलो तर त्या लोकांना माझा संपर्क होतं नाही कृपया.. शेअर करताना... जसाच्या तसा करा...

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...