Showing posts with label मित्र. Show all posts
Showing posts with label मित्र. Show all posts

Wednesday, October 11, 2023

बायको

 बायको


बायको कोण असते...

कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते

कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते

कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते

कधी समजून घेणारी मित्र असते

कधी त्रास देणारी डोकेदुखी असते

कधी मस्का लावणारी असते

कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते

आणि कधी नको असताना जवळ असते

कधी न सांगता समजून घेते

कधी गैरसमज करून घेते

कधी मुलांची काळजी करते

कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते

कधी नवर्याला नावे ठेवते

कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते

कधी फिरायला नेलं कि नखरे करते

कधी हट्टउन हौस पुरवून घेते

कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते

कधी शॉपिंगने बेजार करते

कधी नवर्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते

कधी कोणाची गुपितं सांगते

कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते

कधी तंबी देऊनच घराबाहेर सोडते

कधी घरी यायची वाट बघत बसते

कधी सरळ सूत तर

कधी संशयाचं भूत असते

कधी नवर्याला लगाम घालू पाहते

कधी नवर्यावर प्रेमाचा वर्षाव करते

कधी शेळी तर कधी वाघ असते

कधी आंबट तर कधी गोड असते

कधी न म्हणते - आज मी दमले, 

कधी न संपणारी घराची उर्जा असते

कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते...

बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून घरची म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते..

            

Tuesday, August 1, 2023

हे स्वतः करून पाहा...

 हे स्वतः करून पाहा...


भरपूर मित्र हवेत का? मग स्वतः मित्र व्हा आणि मैत्री निभावण्याचा कसोशीने प्रयत्न करा.


सर्व नातेसंबंधातील विश्वासार्हता जपा. त्याने स्वतःची व समाजाची जोपासना होते. विश्वासावरच जग चालतं, हे कायम लक्षात ठेवा.


लोक चूक करतात तेव्हा त्यांना क्षमा करायला शिका. नाती नष्ट होऊ देऊ नका. त्यांच्यात सुधारणा घडवून आणा, चूक आपल्याही हातून होऊ शकते, हे विसरू नका. एखाद्याच्या कृतीमुळे जर तुमचं काही नुकसान झालं असेल तर ते मुद्दामच केलं आहे असा पूर्वग्रह ठेवू नका.

मित्रमंडळीना आवर्जून घरी बोलवा. ते आपल्याकडे येतात तेव्हाच आपल्यात जवळीक आणि आपुलकीचा धागा निर्माण होतो. आपण त्यांना बोलावतो तेव्हा त्यातून आपली आपुलकी निर्माण करण्याची गरज व्यक्त होत असते..


ई-मेल्सद्वारे आलेले मेसेज, व्हाट्सएप वर आलेले मेसेज आणि फोन कॉल्सना न चुकता प्रतिसाद द्या. कुणाला ई-मेल केला किंवा रिप्लाय दिला नाही किंवा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर माणूस वैतागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्यांना रिप्लाय देण्यानं माणसाला आपला निरोप तरी पोहोचल्याचा दिलासा मिळतो.


शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. ते कधी रस्त्यात भेटले तर हसून ओळख दाखवायला विसरू नका शेजाऱ्यांच्या आनंदाच्या व दुःखाच्या प्रसंगात त्यांना जरूर भेटा. त्यांना हवी ती मदत करा. मैत्री दीर्घकाळ कशी टिकेल याचा विचार करून वागा. जुने मित्र लांब जाण्यानं काळाच्या ओघात अंतर पडतं, पण संपर्क ठेवल्यास हे अंतर पुसताही येतं. 

दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही कधीतरी विचार करा इतरांची बाजूही पटेल. यामुळे तुमचा दृष्टिकोन व्यापक होईल व लोकंही तुमच्या बोलण्याचा विचार करतील


✍️वसुधा इंगळे

Wednesday, May 3, 2023

माझं मन तुझ्यात

माझं मन तुझ्यात


 प्रत्येकाला प्रियसीला स्पर्श करायचा आहे .पण बायको मात्र पवित्र पाहिजे.. 

प्रियसी सोबत लग्नानंतर पण बोलायचं आहे, पण बायकोच्या फोन मध्ये मित्राच नाव पण खटकत...

 ✍️वसुधा इंगळे.

Thursday, April 6, 2023

न उलगडलं कोड

 कसा आहे तू हे सांगणंही कठीण आहे.

कधी खूप चांगला वाटतो तर कधी खूप वाईट.

कधी कधी अस बोलतो की मनात अगदी खोल शिरतो.

आणि कधी असा की मनातून पण पार उतरतो.

कधी कधी तुझ्याशी बोलताना खूप राग येतो तर कधी खूप आनंद पण होतो.

कधी कधी अभिमान वाटतो तर कधी पछाताप पण होतो.

कधी कधी तू आपलेसा वाटतो तर कधी परका असल्याची जाणीव होते.

पण खरंच कसा आहे तू हे अजून मलाच नाही कळले. बहुतेक अस वाटत की कधीही न सुटणार कोड आहेस तू........


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...