Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Thursday, December 25, 2025

थोड मनातलं


शब्द फक्त अर्थ सांगण्यासाठी नसतात; जीवनातील मूल्ये समजून घेण्यासाठी संवादाची, नात्यांसाठी विश्वासाची आणि घरातील सुखासाठी प्रेमाची गरज असते. समाजात आपली ओळख निर्माण करण्यासाठी केवळ नाव नाही, तर कर्तृत्व आवश्यक आहे. जीवनात प्रगती साधण्यासाठी साधना, सुख मिळवण्यासाठी समाधान आणि लोकांच्या आठवणीत राहण्यासाठी अंतर्मुख योगदान महत्त्वाचे ठरते. शब्दांपलीकडे समजायला 'संवाद' लागतो, 


नाती टिकवायला निखळ 'विश्वास' लागतो, 

घर सजवायला फक्त वस्तू नाही, 'प्रेम' लागते, 

आणि ओळख निर्माण करायला नाव नाही, 

'कर्तृत्व' लागते.


सुखाचा शोध घ्यायला 'समाधान' लागते, 

प्रगती पथावर चालायला 'साधना' लागते, 

जगावे तर असे की लोक आठवण काढतील, 

त्यासाठी श्वास नाही, लोकांच्या मनात

 'जागा' लागते.


निष्कर्ष

हा विचार आपल्याला शिकवतो की जीवनातील खरी मूल्ये शब्दांपेक्षा अधिक गहन आहेत. संवाद, विश्वास, प्रेम, कर्तृत्व, समाधान, साधना आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करणे हे जीवन यशस्वी व अर्थपूर्ण बनवतात. या तत्वांवर आधारित आयुष्य जगल्यास आपल्याला खरी ओळख मिळते आणि लोकांच्या हृदयात आपली उपस्थिती कायम राहते.

Sunday, June 22, 2025

Father's day

 Father's day ❤️ 




प्रिय डॅडा, "आज father's day आहे".... पण खरं सांगायचं तर, तुमचं महत्व एका दिवसात मोजता येणारही नाही, आणि अजून मी फक्त एक महिन्याची आहे त्यामुळे तुम्हाला काय शुभेच्छा देणारं ? 

तूमच्या शुभेच्छांवर तर चाललयं सगळं...! तरिपण....

मला मोठी झाल्यावर कळेल कि, तुम्ही जे शिकवत आहे ते शाळेच्या कोणत्याच पुस्तकात नसेल..! आणि हो आज एकच गोष्ट सांगायाची ती म्हणजे "आयुष्यात खुप... माणसं भेटतील मला, पण तुमच्या सारखा आधार कोणाचाच नसेल.... Thank you ...आणि father's day ... च्या मनापासून शुभेच्छा...!


तुमचे आरोग्य, आनंद याणि प्रेम असचं अबाधित राहो....!

✍🏻वसुधा इंगळे.

Sunday, July 30, 2023

थोडसं रिलेशनशिपबद्दल.

 "थोडसं रिलेशनशिपबद्दल.."



सध्याच्या तरुणाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो मानसिक त्रासाचा सुध्दा विषय होत चालला आहे. "एखाद्या मुलाच्या आयुष्यात असलेली ती किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात असलेला तो" याही पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे आपण विसरूनच जात आहोत.


प्रेम हे जरी चेहरा पाहून होत असलं तरीही ते टिकतं मात्र चांगल्या स्वभावामुळे व एकमेकांचा एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळे. सुरुवातीला एकमेकांचे स्वभावगुण माहित नसल्यामुळे नात आनंदात राहत; परंतू काही दिवसांनी जेव्हा एकमेकांचे गुण, सवयी अशा एक एक गोष्टी माहित व्हायला लागतात, तेंव्हा नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात होते. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आपण त्या व्यक्तीवर जरा जास्तच अधिकार गाजवायला लागतो. तिने आपण जसं म्हणतो अगदी तसचं वागायला पाहिजे. असं आपल्याला वाटतं. आणि इथूनच खर नातं बिघडायला सुरुवात होते. अशा स्वभावामुळे नात्यांमधील जीवंतपणा कमी होतो; कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र असते. आपल्यावर अधिकार गाजवणे हे कोणालाच आवडत नसते.


यांपुढे जर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढपण अडकून पडू नका, की ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला आपलं जगणच नकोसं वाटेल. त्यांपेक्षा एकाच व्यक्तीवर एवढं प्रेम करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करायला शिकूया. आपल्याला आजपासून प्रेमाची व्याप्ती वाढवायला शिकायचं आहे. तसेच आयुष्य हा एक प्रवास आहे ज्या व्यक्तीचं स्टेशन आलं तो व्यक्ती उतरणारच आहे भलेही तो व्यक्ती कितीही आवडत असला तरीही.म्हणूनच जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर एवढं पण वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वतंत्र आयुष्य आहे. हे मान्य करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया.



✍️वसुधा इंगळे

Wednesday, July 26, 2023

प्रेम आणि काळजी

 प्रेम आणि काळजी

काळजात जर प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतुन व्यक्त होत असत.... पण अति काळजी आणि अति प्रेम हे दोन्हीही वाईट असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं का साखर गोड आहे म्हणून चहा मध्ये कपभर टाकत नाही किंवा मिठाशिवाय चव नाही म्हणून मुठभर मीठ टाकत नाही. त्याच पद्धतीने काळजी आणि प्रेम हे लिमिटमध्ये असेल तरच त्याचा आनंद मिळतो अन्यथा त्याचा त्रास होतो.. अगदी तुमच्या रक्ता मासाचे जरी नाते असले तरीसुद्धा प्रत्येकाचे आपले वेगळे विश्व असते प्रत्येकाला त्याची स्पेस हा द्यायलाच हवी....

      अर्थात ती स्पेस एवढिही नको की त्यात कसलीच माया भावना नाही थोडक्यात, काय तर प्रत्येक गोष्ट की बॅलन्स असण गरजेचे आहे... 

      प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात....माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते..... पण सातत्याने तोच सुवास डोकेदुखीला ही कारणीभूत ठरतो.... म्हणूनच लक्षात ठेवा " अती " कोणतीही गोष्ट नसावी...


✍️वसुधा इंगळे

Sunday, July 23, 2023

माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका

 माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका


जीवन जगत असतांना आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. त्यामधून काही निघून जातात, काही माणसे आपल्यासोबत जोडले जातात. काही माणसांचा सहवास आपल्याला आवडायला लागतो कारण सहवासाने आवड निर्माण होत असते आणि मग आपण कधी त्या व्यक्तीमध्ये गुंतलो हेच आपल्या लक्षात येत नाही.


आपण ज्यावेळी त्या व्यक्तीमध्ये गुंततो तेंव्हा आपण त्या व्यक्तींवर खूप जास्त अधिकार दाखवत राहतो. मग ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, तेंव्हा या गोष्टीचा खूप जास्त मानसिक त्रास हा आपल्याला सहन करावा लागतो. काही गरज नसतांना विनाकारण आपल्यावर दुःखी राहण्याची वेळ येते. या सर्व गोष्टी आपण खूप जास्त माणसामध्ये गुंततो त्यामुळेच घडतात. आजपासून एखादया व्यक्तीसोबत एवढं पण अटैचमेंट नका ठेवू की, ती व्यक्ती थोडं वेगळी वागली किंवा तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागेल.



आपल्याला जर यापुढील आयुष्य अगदी आनंदाने, समाधानाने जगायचे असेल तर आपण आपली ऊर्जा ही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरूया. म्हणजेच आपण आपलं हे आयुष्य एखादया कामात व्यस्त ठेवा आणि मग ते 'काम' पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दयायचं. मग आपल्याला हे पाहण्यासाठी वेळच नाही मिळणार की, कोणं काय करत आहे किंवा हा व्यक्ती असा का वागत आहे?.


आपला खरा प्रॉब्लेम झालाय कुठे तर आपण आपलं आयुष्य हे काही ठराविकच लोकांसोबत बांधून घेतलं आहे त्यामुळे ते लोकं थोडं जरी आपल्या मनाविरुद्ध वागले तर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपले अनेक दिवस याच गोष्टीमुळे दुःखात जात आहेत. 


मित्रांनो, आपलं आयुष्य हे अनिश्चित आहे. आपल्या आयुष्यात काय घडले पाहिजे हेच आपल्या हातात नाही. तिथं कुठ आपण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल विचार करून स्वत: ला त्रास करून घ्यायचा. त्यांपेक्षा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्यानं कसं वागलं पाहिजे याचं त्याला स्वातंत्र्य आहे. विनाकारण त्यांच्यामध्ये गुंतून पडायचं नाही.


✍️वसुधा इंगळे

Saturday, July 15, 2023

अभिनंदन

 अभिनंदन



एकच गोष्ट " मेहनत". आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर माणूस जग जिंकू शकतो. 


मेहनत करण्याची तयारी आणि आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या माणसांची साथ असेल तर केलेल्या कामातून समाधान मिळतेच.... एक नवीन ऊर्जा तयार होते. येणाऱ्या काळात आणखी चांगली कामं करण्याची इच्छा निर्माण होते.


आयुष्यात काही स्वप्नं आपल्या अगोदर आपले आई-वडील पाहत असतात. तुमच्यासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुम्हाला पुर्ण करायचे आहे. त्यातले हे एक खरतरं....


आयुष्य जगत असताना भेटणारी माणसं अनेक असतात पण कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाच्या सोबत राहायचे हे त्या माणसाच्या विचारावर, स्वभावावर आणि मेहनतीवर ठरत असते. नरेंद्र इंगळे त्यातलेच एक नाव. ज्याच्या सोबत उभं राहताना आनंद होतो आणि ज्याचा अभिमान ही वाटतो. आज घरच्यांना, मला, तुमच्या मित्र मैत्रिणी ना तुमच्यासाठी आनंदी झालेलं  पाहून मी समाधानी झाले. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.....


✍️वसुधा इंगळे

Wednesday, June 28, 2023

प्रेम

 प्रेम


"प्रेम" या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार. अनेक सुखं - दुखं:, समाधान, शांती, संकटं, परीक्षा असे एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो. आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे.


एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय? 

खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी "नातं” यावरचे लेख वाचतो. पण माझ्या मते तो एक अनुभव आहे. हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगेवगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते.


प्रवास हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोप्पा होतो.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, June 21, 2023

आठवण

 आठवण


तुझी असण्यापेक्षा 

नसण्याची सवय जास्त 

मी रिकामीच रे 

तू मात्र कामात व्यस्त


खूप काही मनात साचून राहलेल

तुझ्या येण्या कडे लक्ष लागलेल

येशील तेव्हा मनसोक्त बोलु

सुखदुःखाचे कवाड खोलू


गप्पा च्या ओघात 

भान वेळेचे विसरू 

प्रितीच्या अस्मानी

सुखावेल सैरभैर पाखरू


शब्दांनीच ओंजळ

एकमेकांची भरू ... 

तृप्त होऊ मिठीत

दुःख विरहाचे विसरू...



Sunday, April 30, 2023

स्त्रीला काय हव असतं

 सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित.       

"स्त्रीला काय हव असतं?? "


एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


 प्रश्न असा होता, की ... स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजा, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."

राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली. विद्वान बराच फिरला, 

अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली, पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, "दूर जंगलात एक हडळ राहाते ती नक्की सांगू शकेल ...या प्रश्नाचं उत्तर."

विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. हडळ म्हणाली ...

 "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."

विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

तर जीव राजाच्या हातून जाणारच आहे,  म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला होकार दिला. 

लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली, "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता निर्णय घेतला आहे की ...१२ तास ... मी हडळ आणि १२ तास सुंदर परी होऊन राहीन.

आता तुम्ही मला सांगा ...दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?विद्वानांनं विचार केला ... जर ही दिवसा हडळ झाली,तर दिवस सरणार नाही, आणि रात्री झाली तर रात्र सरणार नाही . शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

"जेव्हा तुला वाटेल तेव्हा परी हो, जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो. त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, त्यामुळे मी नेहमीसाठीच परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


स्त्रीला नेहमी ....आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.जर स्त्रीला ....तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽  परी होऊन राहिल, नाहीतर हडळ.  👈🏽

◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

◆  खुशीही तुमचीच आहे  ◆सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷

आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

 कुणाच्या घरी परी आहे ?

              

Wednesday, April 26, 2023

निस्वार्थी प्रेम

निस्वार्थी प्रेम



बघ ना एकदा डोळ्यात माझ्या..

दिसतील भरलेल्या आठवणी तुझ्या..


दिसेल माझ्या नजरेत तुझेच रूप..

प्रेम आहे तुझ्यावर खूप म्हणजे खूप..


मनाच्या ओढिने तुझ्या जवळ आले..

निखळ भावनेने एकरूप झाले..


मान्य आहे थोडा हट्ट करते मी..

प्रेमाचा हा धागा घट्ट केला मी..


इतक्या दिवसाच्या ओढीने 

तुला जवळ घेतलं..

एकरूप होऊन तुझ्याशी 

जणू स्वर्ग सुखच भेटलं..


बघ पुन्हा एकदा माझं हृदय हलवुन..

बघ सार अंतरंग आतून बाहेरून झुलवून..

बघ तुला कुठे त्यात वासना दिसते का?

मग तुला कळेल, खऱ्या प्रेमाला मर्यादा असते का..


अजूनही माझं जीव तुझ्यासाठीच झुरावा..

मग का रे अबोला आणि कसला दुरावा..?


सारी नाती, सारे बंध

सगळ्या पल्याड जाऊन बघ..

होऊन धुंद-बेधुंद,

ह्या क्षणात एकदा वाहून बघ..


माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर..

आयुष्यभर ते असच राहील..

तुझं आहे का रे मझ्यावर?

की एका हट्टामुळे ते विरून जाईल?


पूर्ण झालोय आपण त्या क्षणाला

मनाने आणि तनाने ही..

याची ग्वाही दिलीय हृदयाने,

आणि शरीराच्या प्रत्येक कणानेही..


विचारातून बाहेर येऊन बघ..

पुन्हा तुझ्या मिठीत घेऊन बघ..

माझा प्रेमाचा ओलावा

तुझ्या हृदयात भिडवून बघ..


आता नाही रे शक्य..

तुझ्याशिवाय माझं जगणं

केवळ अशक्य..


काही वावग नाही केलं आपण,

आरश्यात स्वतःकडे बघून घे..

सोडून दे सगळे विचार,

ह्या क्षणात मनमुराद जागून घे..


प्रेम करणं कधीच

गुन्हा ठरत नाही..

पण खरं प्रेम पुन्हा

पुन्हा मिळत नाही..


प्रेमात आणि युद्धात

सगळं सगळं माफ असत..

शुद्ध भावनेनं एकरूप

होण्यात काहीच पाप नसत ..


✍️वसुधा इंगळे.


पूर्ण केलेली माझी पहिली कविता;

(चार वर्षा पूर्वी सहज काही ओळी लिहून ठेवून दिलेल्या चारोळ्या होत्या.  नंतर जवळ जवळ मागच्या वर्षा पर्यंत तरी ह्या चारोळ्याच होत्या. नंतर हळू हळू त्यात काही आठवणी आणि क्षणाची चारोळ्या च्या मध्यमातून भर पडत गेली. अजून 2-4 चारोळ्या लिहिल्या. त्या नंतर जसा मूड होईल किंवा काही आठवलं तर ते मनातले विचार कागदावर उमटले जाऊ लागले, आणि ह्या चारोळ्या ची कविता होत गेली, जी मी काल पूर्णत्वास नेली.)

Wednesday, February 8, 2023

प्रेम

 प्रेम



प्रेमाचे दिवस साजरे करून काही होत नाही , आपला जोडीदार शेवटच्या श्वासापर्यंत सोबत जपता यावा बस इतकचं .🥰❤️ सोबत वाटचाल करत आयुष्याची सांजवेळ यावी.नाते जुळले मनाशी मनाचे ,उगाच नाही जन्मलो आम्ही .फेरे आमचे गत जनमाचे, बळ मिळाले तेव्हा आम्हा संकटाशी झुंजण्याचे ,वचन दिले एकमेका जीवनभर साथ देण्याचे....कुठल प्रॉमिस,कुठला डे,कधी जाणंवलच नाही काय असत मिस यू,लव्ह यू,शेवटचा श्वासअसेपर्यंत तू माझा मी तुझी होऊ काठी आधाराची.जगू असे की मरणाला ही आव्हान देवूनी पुन्हा परतण्याची आस घेवूनी......झाली आता सांजवेळ तुझ्या माझ्या संसाराची,घेवून हात हाती चल जावू पैलथडी.......

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...