"थोडसं रिलेशनशिपबद्दल.."
सध्याच्या तरुणाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो मानसिक त्रासाचा सुध्दा विषय होत चालला आहे. "एखाद्या मुलाच्या आयुष्यात असलेली ती किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात असलेला तो" याही पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे आपण विसरूनच जात आहोत.
प्रेम हे जरी चेहरा पाहून होत असलं तरीही ते टिकतं मात्र चांगल्या स्वभावामुळे व एकमेकांचा एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळे. सुरुवातीला एकमेकांचे स्वभावगुण माहित नसल्यामुळे नात आनंदात राहत; परंतू काही दिवसांनी जेव्हा एकमेकांचे गुण, सवयी अशा एक एक गोष्टी माहित व्हायला लागतात, तेंव्हा नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात होते. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आपण त्या व्यक्तीवर जरा जास्तच अधिकार गाजवायला लागतो. तिने आपण जसं म्हणतो अगदी तसचं वागायला पाहिजे. असं आपल्याला वाटतं. आणि इथूनच खर नातं बिघडायला सुरुवात होते. अशा स्वभावामुळे नात्यांमधील जीवंतपणा कमी होतो; कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र असते. आपल्यावर अधिकार गाजवणे हे कोणालाच आवडत नसते.
यांपुढे जर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढपण अडकून पडू नका, की ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला आपलं जगणच नकोसं वाटेल. त्यांपेक्षा एकाच व्यक्तीवर एवढं प्रेम करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करायला शिकूया. आपल्याला आजपासून प्रेमाची व्याप्ती वाढवायला शिकायचं आहे. तसेच आयुष्य हा एक प्रवास आहे ज्या व्यक्तीचं स्टेशन आलं तो व्यक्ती उतरणारच आहे भलेही तो व्यक्ती कितीही आवडत असला तरीही.म्हणूनच जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर एवढं पण वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वतंत्र आयुष्य आहे. हे मान्य करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया.
✍️वसुधा इंगळे
