"आपुलकीच्या माणसासाठी"
*रोज तुम्ही स्वतःमध्ये 1 टक्के जरी सुधारणा केली, तरी वर्षभरात तुमच्यामध्ये 365 टक्के सुधारणा झालेली असेल.*_
एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.
_*ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते! आयुष्यात व्यवहार तर खुप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही...!*_
आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडाला ही पाण्याचा एका थेंबासाठी खाली यावे लागते. परंतु खाली येणे त्यांची हार नसते तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते.
_*यशस्वी तर भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो..*_
जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते असे काही नाही. मधुर वाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते.
_*तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते, ती म्हणजे हा आपल्यापुढे निघून जाईल. नातं कोणतही असू द्या... फक्त इमानदार असलं पाहीजे.*_
जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते! साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसं!
_*माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो... परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना...? परंतू मला वाटतं... माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं... जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..*_
प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही...!
No comments:
Post a Comment