ज्ञान
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान कधीही वाया जातं नसतं. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान असने हे अज्ञान असण्यापेक्षा चांगलं असतं नेहमीच. प्रामाणिकपणे केलेला अभ्यास व घेतलेली मेहनत कधीही वाया जात नाही. त्याचा मोबदला योग्य त्या वेळी व्यक्तीला मिळतोच. माणसाने आपल्याला जमेल ती प्रत्येक गोष्ट शिकायला हवी किंवा शिकायचा प्रयत्न तरी करायला हवा. स्वयंपाकापासून तर आणीबाणीत गाडीचं टायर बदलण्यापर्यत माणसाला सर्वकाही थोडंफार जमायला हवं. मला हे अजिबात माहित नाही किंवा मला हे जमतंच नाही, म्हणण्यापेक्षा त्याबद्दल थोडंफार तरी माहित असणे हे योग्य असते.
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment