मला माणसं जोडावी वाटतात. माणसांना अजिबात दुखवावं वाटतं नाही. शक्य होईल तेवढी चांगली माणसं मी जोडतेय आणि जोडण्याचा प्रयत्न करते.
कोणासोबतही कुठल्याही कारणाने संबंध खराब करावे अस वाटतं नाही. नाईलाज झाला तरंच कधी कधी हा निर्णय घ्यावा लागतो. पण याबाबतीत सुद्धा मी पुढाकार घेत नाही. न दुखवता लांब होऊन जाते. आयुष्यात आजपर्यंत कोणासोबतही विशेष असं काही वाद झाले नाही किंवा संबंध खराब झाले नाही. मी ते पुढे सुद्धा होऊ देणार नाही. भविष्यात कधी असं काही झालंच तर मी ते सुधारण्याचा करायचं प्रयत्न नक्की करेन. माफी मागायला नि माफ करायला सुद्धा शिकेन. Ego, Attitude वगैरे बाजूला ठेऊन माणसाला किंमत देईल. कायमच कुठल्याही वाद आणि भांडणापासून लांबच राहते. भांडणा ची मला भीती वाटते.कारण लोक प्रेमाने बोलताना जेवढं हळू बोलता येईल न तेवढं हळू बोलतात,पण भाडंनात का त्याचा आवाज इतका वाढतो.
मी प्रेम पेरायला प्राधान्य देते कारण द्वेषाची कमी नाही..!
✍️वसुधा इंगळे



