काही वर्षांपूर्वी मोबाईल येण्याआधी ट्रेनमधे, बसमधे पुस्तक वाचनात रमलेली मंडळी हमखास दिसायची... त्यातून "कुठलं पुस्तक आहे, कसं आहे " अशा संवादातून माणसांची ओळख व्हायची. छान वाटायचं..तेव्हा निवांत वेळेचा सदुपयोग किंवा रिलॅक्स होण्याची बहुतांश लोकांची व्याख्या म्हणजे "शांतपणे आराम खुर्चीत बसून आवडत्या पुस्तकाचे वाचन" अशी होती....
तेव्हा माणसं विचारांची सखोल आणि सकारात्मक स्पंदने पुस्तकातून अनुभवायची, त्यामुळे विचारांच संगोपनही छान व्हायला आपोआप मदत व्हायची...
पण "आज" वर काही भाष्य न करता त्या दिवसांच्या आठवणींची साठवण त्या दिवसांची गोडी दर्शविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे..की नाही??
✍️वसुधा इंगळे

No comments:
Post a Comment