पहिल्या बायकोला मुलं होत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी दुसरी बायको केलेली आणि दोघी सोबत राहत असलेली उदाहरणं पाहिली,
काही ठिकाणी तर पहिल्या बायकोच्या बहिणी सोबत सुद्धा नवा संसार थाटलेला पाहिल आहे.
आणि हो आपला समाज हे सगळं मोठ्या मनाने स्वीकारतो..
बरेचदा तर बायकोशी पटत नाही म्हणून सुद्धा दुसरी करतात. म्हणजे बघा स्त्री ला काय किंमत उरली यावरून ???
याच्या उलट जर हेच कारनामे एखाद्या स्त्री ने केले, दोन-दोन नवरे एकाच घरात ???
हाच समाज तोंडात शेण घालेल ना??
स्त्री म्हणजे नेमकं काय आहे ?खेळणं असत का???
आनी असल्या पुरुषांना मात्र समाज मानाने जगायला देतो???
तेव्हा कुठे जाते सामाजिक नीतिमत्ता ??
No comments:
Post a Comment