Thursday, January 12, 2023

मित्र

मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.

कुणी ‘whatsapp’ वर तर कुणी ‘Facebook वर जमतात.

प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.


कारण सगळे विषय ‘Chat’ वरच संपलेले असतात.

मग ‘Chat’ वर भेटूच याचं ‘Promise’ होतं.

आणि संभाषणातून ‘Sign out’ केलं जातं.


‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं.

घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.


‘Available' आणि ‘Busy’ मध्ये

प्रत्येकाचा ‘Status’ घुटमळत राहतो.

आपणहून ‘Add’ केलेल्या मित्रापासून

लपण्याकरिता ‘Invisible’चा आडोसा घेतला जातो. ताप आल्याचं आजकाल आईच्या

आधी ‘Facebook’ला कळतं.

औषधापेक्षा ‘Take care’च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं. 


मनातलं सगळं Facebook वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी?

नात्यांना धरून ठेवायला

‘Net’ ची जाळीच का असावी?


कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.

‘Chat’ला गप्पांनी आणि ‘Smile’  ला

हास्यांनी ‘Replace’ करावं.


शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.


चला तर पूर्वीचे दिवस

पुन्हा अनुभवूया.

मैत्रीला ‘Technology'

पासून जपून ठेवूया.


✍️वसुधा इंगळे

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...