कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा,
आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा.
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे... बोलताना शब्दाची उंची वाढवा आवाजाची नाही.
कारण...
पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते
विजांच्या गडगडाटामुळे नाही..
वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबकं असतं...
डबक्यात डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!!
निवड आपली आहे..
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन...भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!!!
मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि राजहंस मारताना सुद्धा गातो...
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात
किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे हसत खेळत कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही...
म्हणून नेहमी आनंदी राहा.
✍️ वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment