Tuesday, April 25, 2023

नेटवर्क म्हणजे खरंच मायाजाल आहे.

नेटवर्क म्हणजे खरंच मायाजाल आहे.



 Facebook  किंवा तत्सम सोशल मिडीयातून होणाऱ्या सो कॉल्ड फ्रेंड्स वर विश्वास टाकताना...

   Be careful  about what you share... खास करून आशा मैत्रिणी ज्यांना एकटेपणा जाणवतोय आणि तो कमी करायला कुणी मित्र भेटला आहे fb ला! खूप बायका रिलीफ मिळालाय अस वाटून नको नको त्या personal गोष्टी share करत जातात.. का? कशासाठी?... तर काहींना बोलून बरं वाटतं... अहो ज्यांच्या सोबत राहाताय त्यांना सुद्धा तुम्ही नीट ओळखत नसता... मग हे तर... व्हरचुअल नातं!! 

     समोरचा या माहितीचा कसा कुठे वापर करेल माहीत नसतं! खूपदा अस होत की समोरची व्यक्ती जे सांगेल तेच बायका खरं समजतात मग ते त्या व्यक्तीबद्दल असो, त्याने त्या बाईच्या रूपाचं केलेलं कौतुक असो, किंवा तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल  त्याने दिलेल्या comments असो .... U never know....

       का सांगायचं आपलं काही... कुणा तिर्हाईताला?... तो काय करेल? असा कुणी जादूगार नसतो, जो कांडी फिरवेल आणि आपलं आयुष्य सुंदर बनवेल... आपली लढाई ...always आपली स्वतःचीच असते. आता हे आपल्याच कर्मामुळे किंवा अजून काहीही नाव द्या त्याने fact बदलणार नाही. मैत्री असावी ...पण मर्यादा जाणून...  fb सारखं माध्यम फक्त जोडून देत...  कोण कसं? याची खात्री देत नाही हे भान असू द्यावं.

        अनेक बायका आशा आगंतुक मैत्रीच्या जीवावर... घरांमध्ये भांडण करतात, बिघडलेली नाती अधिक complicated करतात आणि त्यांना जो सोडवेल यातून अस वाटणारा... mr मॅजिक असतो तो अशी सत्य समोर आल्यावर ब्लॉक करून बेपत्ता होतो... आणि मग यांचा सुरू होतो तो दुःख आणि सूडाचा प्रवास... ज्यामुळे त्यांचं कणभरही भलं होणार नसतं. उलट त्या अधिक powerless, inconfident आणि विचारीपणा पासून अधिक दूर जातात.

       जे तुमची खाण्या पिण्या पासून सगळी जबाबदारी घेऊन तुम्हाला सांभाळतात ...तेच तुमचे खरे कुणी असतात... मग ते पालक असो वा जोडीदार... हॉस्पिटल ला न्यायची वेळ आलीच तर ... fb वर entertain करणारा सो कॉल्ड mr मॅजिक येणार नसतो कधीही.. हेच वास्तव आहे... 

          नेट वर्क म्हणजे खरंच मायाजाल आहे हे... यात किती अडकायच? कशाचा जीवावर? याचा सारा सार विचार मनात हवा... आणि आयुष्यात लढण्यासाठी पूर्णतः स्वतः वर विश्वास हवा.. आज काल अस झालय की रक्ताची नाती सुद्धा आपली राहत नाहीत. त्यात मग अशा मायावी नात्यांना भुलून आपलं वाटोळं होण्याआधी सावरायला हवं. आपल्या पारखी नजरेला थोडं धार करून ठेवायला हवं... कुठलीही व्यक्ती तुमच्यावर तोवर जबरदस्ती नाही करत ..जोवर.. तुम्ही त्याला .. पर्सनल लेव्हल वर आत शिरू देत नाही...  त्यामुळे... नंतर दोष त्या परक्या व्यक्तीला देण्यापेक्षा... स्वतःला मजबूत बनवावं... आणि माध्यमाला त्याच्या कुवती प्रमाणे वापरावं.


✍️वसुधा इंगळे.

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...