Friday, September 29, 2023

 आयुष्यात ज्या क्षणी तुमच्याकडून चूक घडली आहे असं वाटतं त्याक्षणी तुम्ही त्या व्यक्तीला सॉरी म्हणू शकलात, तरच तुम्ही ते नातं वाचवू शकता.. तरच तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वास परत मिळवू शकता.. 

जितका चूक मान्य करायला उशीर होत जातो, तितका त्या नात्याला ओरखडा पडत जातो, आणि सॉरी नाहीच निघालं तोंडातून, तर विश्वास पण संपतो एवढं नक्की.. विश्वास संपला की नातं देखील संपते... 

अर्थात यासाठी प्रचंड कठोर आत्मपरीक्षण लागते.. समोरच्याने चूक दाखवल्याबरोबर तिथल्या तिथे सॉरी म्हणण्याचा मनाचा मोठेपणा लागतो.. आणि त्या माणसाला जो काही त्रास तुमच्या चुकीमुळे झालेला असतो, त्यासाठी त्याचे जे काही तळतळाट लागलेले असतात ते देखील निघून जातात.. अवघड वळणावर आलेलं नातं नव्याने पुढे जाऊ शकते..


No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...