प्रिय नवीन आई
तुम्हाला ही वाटत का मुल जन्माला घालणं सोप्प नसतं!!! मला तर वाटतं!!
पुर्ण नऊ महिने गरोदर असताना जेवढा त्रास होत नाही तेवढ नंतर होतो...पण आई होताना तो त्रास विसरून जातो.
- प्रसुतीच्या वेळी येणाऱ्या कळा म्हणजे मरणाच्या दारात उभं असल्यासारखं.. तरी ती आई धीर धरते.
- प्रसुती नंतर टाके म्हणजे बसता उठता त्रास.. पण व्यक्त कस होणार, तो त्रास सहन करावाच लागतो. कारण बाळाकडे पाहुन त्या आईची सहन करण्याची क्षमता वाढलेली असते.
- नंतर आईची झोप, बाळाला पिण्यासाठी झोपेतुन जागे करणे, आपल्या बाळाला काय होत किंवा त्याच पोट भरत असेल का हे टेन्शन.
या असंख्य गोष्टींचा भार, आईची चिडचिड आणि टेन्शन वाढवतं.
ती आई बाळा कड़े पाहून सगळ विसरून जाते!! आणि उपाय शोधत असते !!
✍🏻 वसुधा इंगळे.
No comments:
Post a Comment