🌸सावित्रीमाई🌸
"जी माणसे इतिहास घडवतात ती माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाहीत ." आणि "जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे इतिहास कधीच घडवु शकत नाहीत"....
🌸 सावित्रीमाईंचा जन्म झाला तो काळ म्हणजे पावणे दोनशे वर्षापुर्वीचा काळ! त्यावेळी समाजाची रचना विषमतेवर आधारीत होती. स्रीयांची स्थिती दुय्यम होती. स्त्री शिक्षणापासुन वंचित होती. शिक्षण हे फक्त पांढरपेशा समाजापुरतेच मर्यादित होते. अस्प्रुश्यता , हुंडा पध्दती , जरठ कुमार विवाह , सतीची चाल अशा अनेक अनिष्ट प्रथेखाली स्री भरडली जात होती . सतीची चाल म्हणजे काय?....तर पत्नीने पतीच्या जळत्या चित्तेमध्ये स्वत:ला झोकुन देणे.... कल्पना करा ऐकुणच अंगावर काटे येतात....अशी दयनीय अवस्था स्रियांची होती....कधी तुमच्या वाचनात आले का? एखाद्या पतीने पत्नीच्या चित्तेवर स्वत:ला झोकुन दिले...नाही ना परंतु स्रियांना हे अग्नीदिव्यातुन स्वखुशीने नव्हे तर जबरदस्तीने जावे लागे. अशी ह्रदय हेलावणारी स्रीची परीस्थिती होती. फक्त चुल आणि मुल . रांधा-वाढा-उष्टी काढा ऐवढ्यापुरतेच तिचे क्षेत्र मर्यादित होते. म्हणुन ती अबला , दुर्बल झाली होती .
म्हणुन म्हणावसं वाटतं....🌸
🌸स्री जन्मा तुझी कहाणी।
ह्रदयी अम्रुत नयनी पाणी।..😢
अशी परिस्थिती पाहुन मन हेलावुन जाते. पण विरोध कोणी करायचा? समाजाचा रोष कोणी ओढुन घ्यायचा? अशा या परिस्थितीचे आव्हान क्रांतिबा जोतिबा फुले यांनी स्विकारले....👍💐💐
याच काळात तेजोमय ज्ञानज्योती सावित्रीमाईंचा जन्म पुणे जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी वडील खंडोजी नेवासे (पाटील) आई सत्यवती यांच्या पोटी १ जानेवारी १८३१ साली १९ व्या शतकात स्रियांच्या सामाजिक आणि शैक्षाणिक विकासासाठी भारताच्या भुमीत या तेजस्वीनीचा जन्म झाला....🌸
वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी इ.स.१८४०या साली सावित्रीमाईंचा विवाह महात्मा ज्योतीबा फुले यांच्या बरोबर झाला. लग्नाच्या आधी सावित्रीमाई अशिक्षित होत्या पण शिक्षणाची विलक्षण आवड होती . सावित्रीमाई हुशार आणि कर्तुत्वान होत्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्व जाणले होते . म्हणुन शेतीची कामे करून विश्रांतीच्या वेळेस त्यांनी सावित्रीमाईंना शिक्षणाचे धडे दिले...🌸
१जानेवारी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढुन आत्याचाराच्या दुष्ट चक्रातुन स्रीयांना व अस्प्रुश्याना बाहेर काढुन शिक्षणाचे दरवाजे खुले केले...🌸
🌸घोड्याला शिकवण्यासाठी चांगल्या घोडेस्वाराचे गरज असते , हत्तीला शिकविण्यासाठी चांगल्या माऊताची गरज असते तसेच मुलींना शिकविण्यासाठी चांगल्या स्री शिक्षकाची गरज असते....आणि म्हणुनच महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना शिकविले व भारताची पहिली शिक्षिका म्हणुन बहुमान दिला. व नतंर त्या पहिल्या प्राध्यापिका झाल्या....👍🌸
महात्मा जोतिबा फुलेंनी स्रीशिक्षणाचा विढा उचलला होता . त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत होतेन. सावित्रीमाई त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्यापाठीशी सावलीसारख्या उभ्या होत्या...👍🌸
परंतु सावित्रीमाईंना सनातनी लोक धर्म बुडवी ,सटवी , अवदसा असे शब्द वापरून अपमानीत करायचे. वाटेत उभे राहुन दगड , चिखल शेणाचा मारा करायचे अशाप्रकारे सावित्रीमाईंना कर्मट सनातन्यानी खुप त्रास दिला. परंतु त्या डगमगल्या नाही . आपले कार्य प्रामाणिकपणे चालुच ठेवले....👍💐💐कारण महात्मा फुलेंना माहित होते...
🌸पुस्तकाने मस्तक सुधारत असतं ।
आणि जे मस्तक सुधारलेलं असतं।
ते कोणापुढेही नतमस्तक होत नसतं ।🌸
स्रीयांनी शिकावे म्हणुन त्या तळमळीने कार्य करीत होत्या ..
अशा या सावित्रीमाईवर काळाने झडप घातली . प्लेगच्या रोग्यांची सेवा करता करता स्व:ताच प्लेगच्या भीषण रोगास बळी पडल्या आणि १० मार्च १८९७ साली अनंतात विलीन झाल्या..😭
🌸सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आकाशात झेपण्याचे बळ आहे ।
स्री शिक्षणाणासाठी तु केलेल्या कार्याचेच हे फळ आहे ।
🌸जिच्यामुळे महिला आज समाजात सन्मानाने उभी हाई ।
ती ज्ञानज्योती , महिला विधाती सावित्रीमाई , सावित्रीमाई....👍
🌸सावित्रीमाईंच्या १९2 व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👏👏👏👏👏