Saturday, January 7, 2023

वेळेचा सदुपयोग


 काही वर्षांपूर्वी मोबाईल येण्याआधी ट्रेनमधे, बसमधे पुस्तक वाचनात रमलेली मंडळी हमखास दिसायची... त्यातून "कुठलं पुस्तक आहे, कसं आहे " अशा संवादातून माणसांची ओळख व्हायची. छान वाटायचं..तेव्हा निवांत वेळेचा सदुपयोग किंवा रिलॅक्स होण्याची बहुतांश लोकांची व्याख्या म्हणजे "शांतपणे आराम खुर्चीत बसून आवडत्या पुस्तकाचे वाचन" अशी होती....

तेव्हा माणसं विचारांची सखोल आणि सकारात्मक स्पंदने पुस्तकातून अनुभवायची, त्यामुळे विचारांच संगोपनही  छान व्हायला आपोआप मदत व्हायची...

पण "आज" वर काही भाष्य न करता त्या दिवसांच्या आठवणींची साठवण त्या दिवसांची गोडी दर्शविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे..की नाही??


✍️वसुधा इंगळे

डोंबाऱ्याचा खेळ

 मी पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळ – 



लहानपणापासून मला डोंबारी, माकडवाला, अस्वलवाला यांचे खेळ पाहण्याची विलक्षण आवड आहे. आपण तिकिटे काढून सर्कशीला जातो, प्राणिसंग्रहालयाला भेट देतो. पण डोंबाऱ्याचा खेळ पाहायला काही आपल्याला तिकीट काढावे लागत नाही


आज पनवेल स्टेशन ला उतरुन बाहेर आले सकाळ ची वेळ, डोंबाऱ्याच्या ढोलक्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मी मोबाईल मधून डोकं काढून आवाजाच्या दिशेने नजर टाकली. डोंबाऱ्याचे कुटुंब पनवेल स्टेशन च्या बाहेर मोकळ्या जागी आले होते. त्यातील बाप्या आपले ढोलके जोरजोराने वाजवत होता. आपला खेळ पाहण्यासाठी त्याला स्वत:च्या भोवती प्रेक्षकांची गर्दी हवी असते. आपल्या ढोलक्याच्या आवाजातून तो प्रेक्षकांना सांगत होता, “या, या, आमचा खेळ पाहायला या!”


पुरेशी गर्दी जमल्यावर डोंबाऱ्याने आपल्या खेळाला सुरवात केली. डोंबारी हा त्या खेळातील जणू कॅप्टनच होता. त्याचबरोबर तो खेळाचा निवेदकही होता. आपल्या मुलाबाळांनी सुरू केलेल्या खेळाचे तो रसभरीत वर्णन करत होता. जणू धावते समालोचनच! त्याचबरोबर तो प्रेक्षकांना टाळ्या वाजवून कसरत करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास आवाहनही करत होता.


डोंबाऱ्याच्या मुलांनी कोलांट्या उड्या मारून व वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून लोकांना रिझवले. नंतर त्या डोंबाऱ्याने काही चित्तथरारक खेळ करून दाखवले. त्याच्या मुलीने हातातल्या काठीने तोल सावरत उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालून दाखवले. त्याने आपल्या लहान बाळाला काठीवर बांधून ती काठी दातांवर पेलली.


डोंबाऱ्याच्या बायकोने आपल्या केसांना एक प्रचंड धोंडा बांधून तो वर उचलला. नंतर डोंबाऱ्याने कमालच केली. त्याने एका बुक्क्यात मोठा-थोरला दगड फोडला. तेव्हा लोकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट केला. .


ते सारे पाहून माझ्या मनात आले की, ऑलिंपिकमधील खेळांडूच्या वाट्याला येणाऱ्या कौतुकाचा काही अंशसुद्धा या अभागी कसरतपटूंच्या वाट्याला येणार नाही का?


✍️वसुधा इंगळे

Friday, January 6, 2023

नात म्हणजे नक्की काय?


 नातं म्हणजे नक्की काय ?


 खरतरं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू दे,ते सहज असावे . नात्यातील सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या कदाचित आपल्याकडून ही हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …

अशी हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव, श्रीमंतीचा बडेजाव, उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं, नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज - गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही .

एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग्यात दोन्ही व्यक्तींनी समानपणे बांधून ठेवणे आवश्यक असते . कारण नातं हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने ,सहजतेने सांभाळावं लागतं. दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम,विश्वास,आपुलकी असणं हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी 'रक्त 'पेक्षा 'मन 'जुळणं जास्त महत्वाच ठरतं . अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात . लादलं जातं ते नातं नसतंच मुळी . ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी,स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो .

आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …नाती आणि आयुष्यही ……………. !!!!!


आज नाती विभक्त होत आहेत, एकत्र कुटुंब पद्धती चे प्रमाण कमी होत आहे.


✍️ वसुधा इंगळे

Wednesday, January 4, 2023

शेतकरी ब्रँड


          

 सोनारा सोबत दोस्ती करा, तो सोन फुकट देणार नाही. 

सिंधी मारवाडी सोबत दोस्ती करा, कोणतीही वस्तू दुकानातली फुकट देणार नाही. 

सुतारा सोबत दोस्ती करा, कोणतीही लाकडी वस्तू फुकट देणार नाही. 

लोहारा सोबत दोस्ती करा,पण लोखंडी वस्तू फुकट देणार नाही.

जगातल्या कोणत्याही व्यावसायिका सोबत दोस्ती करा, काहीच फुकट मिळणार नाही. 


पण शेतकऱ्यांसोबत दोस्ती करा, ओंजळ भर शेंगा... हरभरा.. ऊस अंबाडीची भाजी आणि खूप काही फुकट घेऊन जा.

 शेतकरी राजा पैसे मागणार नाही.. ही उदारता फक्त शेतकऱ्या जवळच आहे.


✍️वसुधा इंगळे

Tuesday, January 3, 2023

सावित्रीबाई फुले


 🌸सावित्रीमाई🌸

          "जी माणसे इतिहास घडवतात ती  माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाहीत ." आणि "जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे इतिहास कधीच घडवु शकत नाहीत"....


         🌸 सावित्रीमाईंचा जन्म झाला तो काळ म्हणजे पावणे दोनशे वर्षापुर्वीचा काळ! त्यावेळी समाजाची रचना विषमतेवर आधारीत होती. स्रीयांची स्थिती दुय्यम होती. स्त्री शिक्षणापासुन वंचित होती. शिक्षण हे फक्त पांढरपेशा समाजापुरतेच मर्यादित होते. अस्प्रुश्यता , हुंडा पध्दती , जरठ कुमार विवाह , सतीची चाल अशा अनेक अनिष्ट प्रथेखाली स्री भरडली जात होती . सतीची चाल  म्हणजे काय?....तर पत्नीने पतीच्या जळत्या चित्तेमध्ये स्वत:ला झोकुन देणे.... कल्पना करा ऐकुणच अंगावर काटे येतात....अशी दयनीय अवस्था स्रियांची होती....कधी तुमच्या वाचनात आले का? एखाद्या पतीने पत्नीच्या चित्तेवर स्वत:ला झोकुन दिले...नाही ना परंतु स्रियांना हे अग्नीदिव्यातुन स्वखुशीने नव्हे तर जबरदस्तीने जावे लागे. अशी ह्रदय हेलावणारी स्रीची परीस्थिती होती. फक्त चुल आणि मुल . रांधा-वाढा-उष्टी काढा ऐवढ्यापुरतेच तिचे क्षेत्र मर्यादित होते. म्हणुन ती अबला ,  दुर्बल झाली होती .

म्हणुन म्हणावसं वाटतं....🌸


🌸स्री जन्मा तुझी कहाणी।

ह्रदयी अम्रुत नयनी पाणी।..😢

अशी परिस्थिती पाहुन मन हेलावुन जाते. पण विरोध कोणी करायचा? समाजाचा रोष कोणी ओढुन घ्यायचा? अशा या परिस्थितीचे आव्हान क्रांतिबा जोतिबा फुले यांनी स्विकारले....👍💐💐


         याच काळात तेजोमय ज्ञानज्योती सावित्रीमाईंचा जन्म पुणे जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी वडील खंडोजी नेवासे (पाटील) आई सत्यवती यांच्या पोटी १ जानेवारी १८३१ साली  १९ व्या शतकात स्रियांच्या सामाजिक आणि शैक्षाणिक विकासासाठी भारताच्या  भुमीत या तेजस्वीनीचा जन्म झाला....🌸


        वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी इ.स.१८४०या साली सावित्रीमाईंचा विवाह महात्मा ज्योतीबा फुले यांच्या बरोबर झाला. लग्नाच्या आधी सावित्रीमाई अशिक्षित होत्या पण शिक्षणाची  विलक्षण आवड होती . सावित्रीमाई हुशार आणि कर्तुत्वान होत्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्व जाणले होते . म्हणुन शेतीची कामे करून विश्रांतीच्या वेळेस त्यांनी सावित्रीमाईंना शिक्षणाचे धडे दिले...🌸


१जानेवारी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढुन आत्याचाराच्या दुष्ट चक्रातुन स्रीयांना व अस्प्रुश्याना बाहेर  काढुन शिक्षणाचे दरवाजे खुले केले...🌸


        🌸घोड्याला शिकवण्यासाठी चांगल्या घोडेस्वाराचे गरज असते , हत्तीला शिकविण्यासाठी चांगल्या माऊताची गरज असते तसेच मुलींना शिकविण्यासाठी चांगल्या स्री शिक्षकाची गरज असते....आणि म्हणुनच महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना शिकविले व भारताची पहिली शिक्षिका म्हणुन बहुमान दिला. व नतंर त्या पहिल्या प्राध्यापिका झाल्या....👍🌸


        महात्मा जोतिबा फुलेंनी स्रीशिक्षणाचा विढा उचलला होता . त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत होतेन. सावित्रीमाई त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्यापाठीशी सावलीसारख्या उभ्या होत्या...👍🌸


         परंतु सावित्रीमाईंना सनातनी लोक धर्म बुडवी ,सटवी , अवदसा असे शब्द वापरून अपमानीत करायचे. वाटेत उभे राहुन दगड , चिखल शेणाचा मारा करायचे अशाप्रकारे सावित्रीमाईंना कर्मट सनातन्यानी खुप त्रास दिला. परंतु त्या डगमगल्या नाही . आपले कार्य प्रामाणिकपणे चालुच ठेवले....👍💐💐कारण महात्मा फुलेंना माहित होते...


        🌸पुस्तकाने मस्तक सुधारत असतं ।

आणि जे मस्तक सुधारलेलं असतं।

ते कोणापुढेही नतमस्तक होत नसतं ।🌸


        स्रीयांनी शिकावे म्हणुन त्या तळमळीने कार्य करीत होत्या ..

अशा या सावित्रीमाईवर काळाने झडप घातली . प्लेगच्या रोग्यांची सेवा करता करता स्व:ताच प्लेगच्या भीषण रोगास बळी पडल्या आणि १० मार्च १८९७ साली अनंतात विलीन झाल्या..😭

   🌸सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आकाशात झेपण्याचे बळ आहे ।

स्री शिक्षणाणासाठी तु केलेल्या कार्याचेच हे फळ आहे ।


🌸जिच्यामुळे महिला आज समाजात सन्मानाने उभी हाई ।

ती ज्ञानज्योती , महिला विधाती सावित्रीमाई , सावित्रीमाई....👍

  

       🌸सावित्रीमाईंच्या १९2 व्या जयंती निमित्ताने विनम्र  अभिवादन🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👏👏👏👏👏

  

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...