Wednesday, February 8, 2023

प्रेम

 प्रेम



प्रेमाचे दिवस साजरे करून काही होत नाही , आपला जोडीदार शेवटच्या श्वासापर्यंत सोबत जपता यावा बस इतकचं .🥰❤️ सोबत वाटचाल करत आयुष्याची सांजवेळ यावी.नाते जुळले मनाशी मनाचे ,उगाच नाही जन्मलो आम्ही .फेरे आमचे गत जनमाचे, बळ मिळाले तेव्हा आम्हा संकटाशी झुंजण्याचे ,वचन दिले एकमेका जीवनभर साथ देण्याचे....कुठल प्रॉमिस,कुठला डे,कधी जाणंवलच नाही काय असत मिस यू,लव्ह यू,शेवटचा श्वासअसेपर्यंत तू माझा मी तुझी होऊ काठी आधाराची.जगू असे की मरणाला ही आव्हान देवूनी पुन्हा परतण्याची आस घेवूनी......झाली आता सांजवेळ तुझ्या माझ्या संसाराची,घेवून हात हाती चल जावू पैलथडी.......

Saturday, February 4, 2023

आता मला जमायला लागलंय

 आता मला जमायला लागलंय!


आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 

जे जे मला दुखवत गेले, त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं,

आता मला जमायला लागलयं!


संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी, वाद न घालता तेथून दूर 

निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय!


माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून, त्यात शक्ती खर्ची घालून,

आजूबाजूला जे जे उत्तम आहे, त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय

हे ही जाणवायला लागलयं!


आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत

स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आता जमायला लागलंय!


कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर

काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही!

कधी-कधी काहीही न बोलणं

किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं

खूप काही बोलून जातं,

आणि सांगूनही जातं! 

हे ही कळायला लागलंय!


आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधनं आणू शकत नाही,

पण स्वतः च्या मनावर मात्र

बांध घालू शकतो.

आपण अशा लोकांचे वागणे

किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या

आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं कां?

हे ठरवणं गरजेचं असतं

हे ही कळायला लागलयं!


कधी कधी परिस्थितीला

आहे तसच सोडून देणं,

आणि शांत राहणं सोईच ठरतं!

लोकांना कुठल्याही गोष्टीचं

स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळटपणाचं आहे हे कळल्यावर मी आता मला,

त्या दृष्टीने घडवायला लागलोय!


मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षाने शोध घेत होतो ती मन:शांती, समाधान मला मिळालं तेव्हा ठरवलं की,मी अशा लोकांपासून

लांब राहावे. ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला 

त्यांच्या साच्यात बसवणं शक्य नाही त्यांच्यापासून अंतर ठेवणं

आता मला जमायला लागलयं!


सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात.

तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणाऱ्या, वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलयं!


माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं, आणि उशीरा कां होईना पण मी आता त्या वाटेवर

समाधानानं पावलं टाकायला लागलोय! 

त्या वाटेवर स्थिर राहणं,

आता मला जमायला लागलंय!🌹🌿🌾

Wednesday, February 1, 2023

निर्णय

 तुझी गोड गोड बोलून परवानगी मिळवण्याची पद्धत मला चांगलीच ज्ञात झाली आहे ... पण ज्या गोष्टी माझ्या नजरेत वाईट असतील त्याची परवानगी तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि फक्त तुमची अडवणूक करायची म्हणून नाही, तर तूम्ही चुकूनही चुकीच्या वाटेला जाऊ नयेत किंवा अडचणीत फसू नयेत यासाठीच हा अट्टहास असेल. 


मग तिथे तुमचे अश्रूही माझ्यासाठी  फक्त त्या वेळापुरते गौण असतील. हे फक्त तुमच्यापुरतंच नाही तर घरातील प्रत्येकाला लागू होईल.. फक्त व्यक्तिपरत्वे नियम बदलत राहतील. मला स्त्रीप्रधान घर नकोय मला माझ्या पाठीमागेही माझी काळजी आणि निर्णय समजणारं प्रमाणिक कुटुंब हवंय.. स्त्री म्हणून इतकंही पुरेसं आहे माझ्यासाठी..!❤️


✍️वसुधा इंगळे

बाप

बाप

दोन पाऊलं चालल्यावरही थकणारे पाय जेव्हा वडिलांसाठी काही खास खरेदी करायला दोन तासही चालायला तयार असतात तेव्हा कळतं.. "बाप" माणूस नजरेतून आणि शब्दांतून नाही.. तर मनातून सुरू होऊन रक्तापर्यंत भिनलेला असतो..!

मच्छिन्द्र टिंगरे

वेश्या नावाची आई......

पोरानं आईला विष पाजलं, अन आईनं पोराला अमृत.....


बारामतीतं घडलेली  सत्य घटना.... संबंधिताच्या परवानगीने शेअर करतं आहे.... याबद्दल कोणाला माहिती असल्यास कोणी.. नावं, गावं, किंवा ओळख निर्माण होईल अशी कमेंट करू नये...


गेल्या महिन्याभरापासून माझ्याकडे एक मॅटर चालु होतं काल त्याचा आनंददायी शेवट झाला.... साधारण एकमहिन्यापूर्वी एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या... त्यांनी मला सांगितले साहेब पोरगं मला सोडून गेलंय मला बोलतं नाही मी एकटी राहते ... मी सगळी घटना समजून घेतली... त्या मावशीने मला जी हकीकत सांगितली ती ऐकून शहारे आले.....त्यांनी सांगितले मला एकचं मुलगा आहे.... माझ्या नवऱ्याचा मुलगा दोन वर्षाचा अपघाती मृत्यू झाला... मी सासरीच राहत होते.. काही काळ गेल्यानंतर मी एकटी असल्याचा फायदा घेत घरातल्या सहित काही पुरुषांची वाईट नजर माझ्यावर पडत होती... मी जर आयुष्यात कोणाला तरी स्थान दिल असतं तर, माझ्या मुलाच्या अन माझ्या प्रेमात अंतर पडलं असतं... माझ्या मुलाला मला काहीतरी घडवून दाखवायचं आहे...... असं चंग बांधून घरं सोडलं अन बारामतीतं रहायला आले..... काही दिवस माहेरच्या लोकांनी साथ दिली परंतू नंतर त्यांच्या अडचणीमुळे ते फारशी मदत करू शकले नाहीत....मुलाचं शिक्षण झालं ग्रॅज्युशन झाल्यावर.. त्याला एम. पी. एस.सी.चा अभ्यास करायचा होता.... मला काही लोकांनी सांगितले त्याला पुण्याला ठेवला तर चांगला अभ्यास होईल... मी काही ओळखीच्या लोकांकडून उसणवारी चे पैसे घेऊन त्याला पाठवलं....


त्या काळात त्याची परीक्षा झाली तो पास झाला... तो लिपिक म्हणून नोकरीला लागला... पण दरम्यान च्या काळात मी बारामतीत एकटी राहत होते... मुलाला माझ्याबद्दल कोणीतरी चुकीचं सांगितले.... आईला एकांत भेटावां म्हणून तुला तिने पुण्याला पाठवलं होतं असा गैरसमज त्याच्या मनात कोणीतरी भरवला.... त्याने माझ्याशी वाद घालायला सुरवात केली.... माझे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असा समज त्याच्या मनात घरं करून बसला होता.... आमचा वाद विकोपाला गेला.... मला तो तू वेश्या आहॆस असं ही म्हटला...एक दिवशी त्याने विषाची बाटली आणून आत्महत्या कर असे सांगितले......मला त्याने विष प्यायला भाग पाडलं.... पण काही लोकांनी दवाखान्यात घेऊन गेले..... तेथे पोलीस माझे जबाब घ्यायला आले.... मी खरं सांगितले असतं तर त्याचं करियर उधवस्त झालं असतं म्हणून मी पोलिसांना मीच आजरपणाला कंटाळले होती म्हणून मी विष घेतलं असं सांगितले..... आता तो नोकरीं करतोय.... लग्न ही झालयं...मला त्याच्याकडे जायचंय काही करुन त्याला समजून सांगा असं मला विनंती केली......

मी त्यांचा नंबर घेतला.... फोन केला.. मी मच्छिन्द्र टिंगरे बोलतोय.. मला तुम्हाला भेटायचं आहे... कधी भेट होईल.. तो म्हणाला सर मी तुम्हाला ओळखतो... काय कामं होत... मी त्याला म्हटलं भेटल्यावर बोलू म्हटलं... नवरा बायको दोघे या असं म्हटलं..... गेल्या आठवड्यात दोघेजण माझ्याकडे आले.. आम्ही माझ्या ऑफिस ला बसलो.... योगायोगाने त्याची पत्नी पण मला ओळखत होती.... ती मला म्हटली सर तुम्ही आमच्या शाळेत आला होता.. पर्यावरण विषयावर तुमच व्याख्यान होतं..... ती ओळखिची निघाल्यावर माझं कामं सोपं झालं...

मी तिला बाजूला घेतलं तिला म्हटलं हा जर स्वतःच्या आईवर संशय घेतोय तरी उद्या तुझं काय चुकलं तरकाय होईल..... काही तासाच्या चर्चेनंतर मुलाला स्वतःची चूक कळाली....मला काही वेळा त्याला धमकी पण द्यावी लागली... तो आईला घेऊन जायला तयार झाला तेथूनच आई त्यांच्याबरोबर मुलाकडे चालली होती..... सगळेजण बाहेर पडले आई घाई गडबडीत माघारी आली पर्स मधून पाचशेच्या काही नोटा बाहेर काढल्या अन म्हणाली सर तुमची फी घ्या.... मी हसून म्हणालो आयुष्यात खूप कामं केलीत... आज आयुष्यातील सगळ्यात चांगल कामं हातून घडलंय फी नको पण पुण्याला आल्यावर तुमच्याकडे नक्की जेवायला येईल... डोळ्याच्या कडा पानावलेली आई.... मुलाबरोबर निघून गेली... खूप समाधान वाटलं...मी एका प्रॉब्लेम सॉल केला या पेक्षा हे आई नावाचं रसायन काय असतं हे कोडं या जन्मात तरी सुटणार नाही....


मच्छिन्द्र टिंगरे बारामती...9527547547


टीप : अनेक जन माझा लेख व्हायरल करतात परंतू नावं नंबर काढल्यामुळे.. मी जर अजून कोणाला मदत करू शकलो तर त्या लोकांना माझा संपर्क होतं नाही कृपया.. शेअर करताना... जसाच्या तसा करा...

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...