Move On
वेळ निघून जाते पण आठवणी मागे राहतात. भूतकाळातल्या काही गोष्टी तुम्हाला सतत मागे खेचतात, move on होण्यापासून रोखतात. या गोष्टी सोडून द्यायला शिकणं महत्वाचं आहे, आयुष्य वर्तमानात जगणं आवश्यक आहे.
✍️वसुधा इंगळे
Move On
वेळ निघून जाते पण आठवणी मागे राहतात. भूतकाळातल्या काही गोष्टी तुम्हाला सतत मागे खेचतात, move on होण्यापासून रोखतात. या गोष्टी सोडून द्यायला शिकणं महत्वाचं आहे, आयुष्य वर्तमानात जगणं आवश्यक आहे.
✍️वसुधा इंगळे
आठवणी
आठवणी या अशाच असतात. सिगारेटच्या झुरक्यासारख्या मनात ओढून घ्यायच्या, पण तशाच वाऱ्यासोबत सोडून द्यायच्या.
काही आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात, तर काही हवेत विरून जातात. कोणाला मनात ठेवायच आणि कोणाला सोडून द्यायचं हे मात्र आपल्या हातात नसतं.
ती त्या आठवणीमागची भावनिक तीव्रता ठरवत असते. आपण फक्त माध्यम व्हायचं.
✍️वसुधा इंगळे
आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.
बायकांची जात' असं म्हणत जन्माला येताक्षणी, काही बायका जणु काही आपल्याला काय काय वर्ज्य ते ठरवतात. आणि निम्मं जगणं कायमचं नाकारतात. राह्यलेलं निम्मं आयुष्य कसं जगायचं, हे समाज बाईवर लादत असतो. त्यातलाही खुप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो.
बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरुन शंखात कोंडुन घेतो. आणि मन तर मारण्यासाठीच असतं. ते तर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखावरचा वर्ख गळायच्या आतच संपलेलं असतं. गरूडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त. तरीही, ते मन मेलं की जगण सोपं. पण ते जर फिनिक्स पक्ष्यासारखं असलं तर संपलं. मग 'तडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे' अशी फक्त तडफड.....
✍️व पु काळे
स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आनंदात राहाल...
घार उंच उडते म्हणून चिमणीला
कधी टेन्शन येत नाही,
की वाईट वाटत नाही.
ती तिचं आयुष्य आनंदात जगत असते.
पण एक माणूस मोठा झालेला पाहून
दुसऱ्याला लगेच वाईट वाटते,
मत्सर निर्माण होतो.
✍️वसुधा इंगळे
निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...