Wednesday, July 26, 2023

प्रेम आणि काळजी

 प्रेम आणि काळजी

काळजात जर प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतुन व्यक्त होत असत.... पण अति काळजी आणि अति प्रेम हे दोन्हीही वाईट असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं का साखर गोड आहे म्हणून चहा मध्ये कपभर टाकत नाही किंवा मिठाशिवाय चव नाही म्हणून मुठभर मीठ टाकत नाही. त्याच पद्धतीने काळजी आणि प्रेम हे लिमिटमध्ये असेल तरच त्याचा आनंद मिळतो अन्यथा त्याचा त्रास होतो.. अगदी तुमच्या रक्ता मासाचे जरी नाते असले तरीसुद्धा प्रत्येकाचे आपले वेगळे विश्व असते प्रत्येकाला त्याची स्पेस हा द्यायलाच हवी....

      अर्थात ती स्पेस एवढिही नको की त्यात कसलीच माया भावना नाही थोडक्यात, काय तर प्रत्येक गोष्ट की बॅलन्स असण गरजेचे आहे... 

      प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात....माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते..... पण सातत्याने तोच सुवास डोकेदुखीला ही कारणीभूत ठरतो.... म्हणूनच लक्षात ठेवा " अती " कोणतीही गोष्ट नसावी...


✍️वसुधा इंगळे

इग्नोर

 इग्नोर


जी व्यक्ती तुमच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.

 अशा व्यक्तीला कधीच ignore करु नका, किंवा त्याच्याशी वाईट वागून त्याला गमवू नका. 

कारण जीवनात वेळ काढून बोलणारे लोक तुम्हाला खूप भेटतील, पण तुमच्याशी बोलण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसणारे मोजकेच असतात.

✍️वसुधा इंगळे

Monday, July 24, 2023

इर्शाळगड

इर्शाळगड



 इर्शाळगडाच्या पायथ्याशी

 नांदत होते एक गांव, 

क्षणात झाले भुईसपाट 

इर्शाळवाडी त्याचं नाव...


चिल्ल्यां पिल्ल्यांचा तो आवाज 

अचानक दबला गेला, 

गोठ्यातच अंत झाला...

हंबरणाऱ्या जनावरांचा


जीता जागता माणूस 

जमिनीत गाडून मेला, 

रक्ताच्याच पावसाने 

रक्ताचा चिखल झाला...


असा कसा हा निसर्ग

गावावर होता कोपला,

हुंदक्यात अडकला श्वास 

चहूकडे फक्त चिखलच सोडून गेला...


माळीन, तळीये नंतर आता इर्शाळवाडी 

अजुन किती नाहक बळी जाणार ?? 

का समजत नाही मानवाला, 

की तो सुद्धा असाच वागणार...

निसर्गाच्या विरुद्ध वागलो

की तो सुद्धा असच विरुद्ध जाणार...


Sunday, July 23, 2023

माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका

 माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका


जीवन जगत असतांना आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. त्यामधून काही निघून जातात, काही माणसे आपल्यासोबत जोडले जातात. काही माणसांचा सहवास आपल्याला आवडायला लागतो कारण सहवासाने आवड निर्माण होत असते आणि मग आपण कधी त्या व्यक्तीमध्ये गुंतलो हेच आपल्या लक्षात येत नाही.


आपण ज्यावेळी त्या व्यक्तीमध्ये गुंततो तेंव्हा आपण त्या व्यक्तींवर खूप जास्त अधिकार दाखवत राहतो. मग ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, तेंव्हा या गोष्टीचा खूप जास्त मानसिक त्रास हा आपल्याला सहन करावा लागतो. काही गरज नसतांना विनाकारण आपल्यावर दुःखी राहण्याची वेळ येते. या सर्व गोष्टी आपण खूप जास्त माणसामध्ये गुंततो त्यामुळेच घडतात. आजपासून एखादया व्यक्तीसोबत एवढं पण अटैचमेंट नका ठेवू की, ती व्यक्ती थोडं वेगळी वागली किंवा तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागेल.



आपल्याला जर यापुढील आयुष्य अगदी आनंदाने, समाधानाने जगायचे असेल तर आपण आपली ऊर्जा ही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरूया. म्हणजेच आपण आपलं हे आयुष्य एखादया कामात व्यस्त ठेवा आणि मग ते 'काम' पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दयायचं. मग आपल्याला हे पाहण्यासाठी वेळच नाही मिळणार की, कोणं काय करत आहे किंवा हा व्यक्ती असा का वागत आहे?.


आपला खरा प्रॉब्लेम झालाय कुठे तर आपण आपलं आयुष्य हे काही ठराविकच लोकांसोबत बांधून घेतलं आहे त्यामुळे ते लोकं थोडं जरी आपल्या मनाविरुद्ध वागले तर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपले अनेक दिवस याच गोष्टीमुळे दुःखात जात आहेत. 


मित्रांनो, आपलं आयुष्य हे अनिश्चित आहे. आपल्या आयुष्यात काय घडले पाहिजे हेच आपल्या हातात नाही. तिथं कुठ आपण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल विचार करून स्वत: ला त्रास करून घ्यायचा. त्यांपेक्षा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्यानं कसं वागलं पाहिजे याचं त्याला स्वातंत्र्य आहे. विनाकारण त्यांच्यामध्ये गुंतून पडायचं नाही.


✍️वसुधा इंगळे

Saturday, July 22, 2023

एक कटुसत्य

 एक कटुसत्य....

माझ्या पोस्टला इतक्या लाईक येतात,

अमुक-अमुक माझे स्टेटस बघतो,

तमूक-तमूक मला नावाने ओळखतो,

फलाना माझे फोन उचलतो,

डीमका मला मेस्सेज करतो,

मी त्यांच्या किचन मध्ये जाते,

मी यांच्या गाडीत फिरते,

याला काही ही अर्थ नाही मित्रांनो.

"खिशात असेल मनी तरचं विचारतात बरं हाय का धनी"

हा कार्यक्रमच तेवढा खरा आहे...

नाहीतर 

बाकी सब मोह माया है !! 

सोशल मीडियावर 30 लाईक नसल्या तरी चालेल पण खात्यात 30 लाख पडलेले पाहिजेत.

केव्हाही खर्च करता येतात.

पैसे देऊन लाईक वाढवता ही येतात पण लाईक दाखवून किराणा फुकट मिळत नाही.



निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...