Thursday, November 23, 2023

२३ नोव्होंबर

 Hii, सगळे मस्त ना...!

 आजचा दिवस सुद्धा खूप छान होता. तुमच्या सगळ्यांना सुद्धा छान गेला असेल अशी आशा. जेव्हा आपल्याला खूप जास्त एकटे वाटत असते, कशाचेतरी खूप वाईट वाटलेले असते, दिवस खूप खराब गेलेला असतो तेव्हा जर तुमच्या जवळ तुमची हक्काची माणसे असतील जी तुमच्या मनातले लगेंच ओळखून आपला मूड बदलत असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात. अशा माणसांना जपा कारण सुखात तर सगळे जग आपल्या सोबत असतात मात्र दुःखात साथ देणारे खूप कमी असतात. हे तर झाल की जर माणसे असतील तर..! पण ह्यापुढे जाऊन जर अशी माणसे नसतील तरी हरकत नाही. तेव्हा आरशासमोर जायचे आणि त्या आरशातल्या आपल्या सगळ्यात जवळच्या हक्काच्या माणसा बरोबर गप्पा मारायच्या मन मोकळे करायचे ok. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye


✍️वसुधा इंगळे

Thursday, October 19, 2023

स्त्री ची सुंदरता

 स्त्री ची सुंदरता


मला माझ्या च हात चं आवडत बाई,

माझ्यासारखं चविष्ट नाही होत कोणाचं, असं स्वतःचं म्हणून ती रांधत बसते..

माझ्या सारखं स्वच्छ नाही बाई कोणी, मला मी च पुसलेली फरशी आवडते भारी, असं म्हणून  ती राबत बसते..

माझ्या शिवाय मुलांचं पान नाही हालत, म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात देत, ती मुलांचं करण्यात चं गुंतत बसते..

जोपर्यंत हा अट्टहास स्त्री सोडत नाही तोपर्यंत ती सुखी होऊ शकत नाही...!!! तुमच्या या अट्टाहासा पायी तुम्ही कित्येकदा तुमच्या जवळच्या, तुमच्या मदतीला उभ्या असलेल्या स्त्री ला नाकारता आणि नकळत तिचा अनादर करता आणि कायमचा एक मदतीचा हात, एक नात्याचा बंध, एक भावनिक आधार गमावून बसता..!!

प्रत्येक स्त्री नव्हे, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असतें,

प्रत्येकाचे गुण, कला, आवड-निवड ही वेगवेगळी असतें,

 त्यामुळे एकमेकींना त्यावरून नावे ठेवणे सर्व स्त्री वर्गा ने बंद केले पाहिजे,

नसेल तिच्या घरात स्वच्छता फार, पण सुंदरता तिच्या मनात असेल -स्वभावात असेल,

तिच्यात अन्नपूर्णा नसेल, पण सरस्वती असेल..

 तिच्यात सरस्वती नसेल तर लक्ष्मी असेल..

तिच्यात खूप कला नसतील कदाचित पण ती स्वयंपाकात निपुण असेल,

एखादीला नसेल येत घरातलं काम पण अभ्यासात अव्वल असेल कदाचित,

एखादी शब्दात रमणारी असेल, एखादी सुरेल असेल, एखादी नाटकात कमाल असेल..एखादी नखशीखंत कलाकार असेल..

त्यामुळे आपण या गुणांतल्या भिन्नतेचा मनापासून स्वीकार करुन नातं पुढे नेलं तर नात्यांमध्ये खूप सूंदरता येईल, सहजता येईल....!! स्वतः मध्ये जे आहे "ते" च दुसऱ्या मध्ये शोधण्याचा अट्टहास बंद करा आणि त्याच्या मध्ये "जे" आहे त्याचा आदर करा.. तेव्हा तुम्हाला नात्यातलं खरं सुख गवसेल..! आणि तुमच्या चेहऱ्यावर खरं हास्य फुलेल...!! 

समस्त स्त्री वर्गास समर्पित..🙏

Tuesday, October 17, 2023

सुंदर आयुष्य

 सुंदर आयुष्य 

सुंदर आयुष्य तोच जगू शकतो ज्याला फुलासारखं फुलता येतं. आणि जीवनातील प्रत्येक वादळात टिकता येतं.फुलाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सुंदरता आणि हास्य या दोन गोष्टी फुलाकडून शिकाव्या. 

फुलं कोणताही मेकअप न करता सुंदर दिसतात. आपल्याला कोणीतरी तोडून नेईल हे माहित असतांनाही फुलं हसतात. तोडल्यावरही ते हसतातच. ते शेवटपर्यंत लोकांना आनंद देतात. हसवतात व नव्याने जगायला शिकवतात. तस माणसानेही जगावं इतरांना आनंद द्यावा,दुःख देवू नये. त्रासही देवू नये, कारण सुख वाटण्यातच आयुष्याची मजा आहे. 

आपण लोकांना आनंद आणि सुख वाटतं गेलो की, हळूहळू आपल्याबरोबर आपल्या आसपासची माणसंही सुखी आणि आनंदी होतील. म्हणून फुलासारखं सुख आणि आनंद वाटतं रहा.आयुष्य फुलासारखं फुलून जाईल.

✍️ वसुधा इंगळे

Monday, October 16, 2023

      

 मला माणसं जोडावी वाटतात. माणसांना अजिबात दुखवावं वाटतं नाही. शक्य होईल तेवढी चांगली माणसं मी जोडतेय आणि जोडण्याचा प्रयत्न करते.


कोणासोबतही कुठल्याही कारणाने संबंध खराब करावे अस वाटतं नाही. नाईलाज झाला तरंच कधी कधी हा निर्णय घ्यावा लागतो. पण याबाबतीत सुद्धा मी पुढाकार घेत नाही. न दुखवता लांब होऊन जाते. आयुष्यात आजपर्यंत कोणासोबतही विशेष असं काही वाद झाले नाही किंवा संबंध खराब झाले नाही. मी ते पुढे सुद्धा होऊ देणार नाही. भविष्यात कधी असं काही झालंच तर मी ते सुधारण्याचा करायचं प्रयत्न नक्की करेन. माफी मागायला नि माफ करायला सुद्धा शिकेन. Ego, Attitude वगैरे बाजूला ठेऊन माणसाला किंमत देईल. कायमच कुठल्याही वाद आणि भांडणापासून लांबच राहते. भांडणा ची मला भीती वाटते.कारण लोक प्रेमाने बोलताना जेवढं हळू बोलता येईल न तेवढं हळू बोलतात,पण भाडंनात का त्याचा आवाज इतका वाढतो. 


मी प्रेम पेरायला प्राधान्य देते कारण द्वेषाची कमी नाही..!


✍️वसुधा इंगळे

Friday, October 13, 2023

साद - प्रतिसाद

साद - प्रतिसाद...!



काल बोलता बोलता हे म्हणाले.., "हल्ली तु सगळ्या गोष्टी कशा लवकर मान्य करतेस गं.. अजिबात वाद घालत नाही. आढेवेढे घेत नाही म्हणेल त्याला राजी असतेस."


या त्यांच्या वाक्यावर तेव्हा फक्त मी हसले. पण नंतर त्याचा विचार केल्यावर अनेक माझ्याच गोष्टी माझ्या समोर आल्या.


वयाच्या तिशी पर्यंत माणुस खुप जास्त हवेत असतो. वास्तविक परिस्थिती समजुन न घेता पत्त्यांचे बंगले रचत जातो. ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारी ताकद माझ्या पंखात नाही... ही गोष्ट त्याच्या भाईच नसते. कुणी जर उत्तरेला चल म्हटलं, तर याला दक्षिणेलाच जायचं असतं. तेच संसारातही होतं..


नवऱ्याला ब्राऊन सोफा घ्यायचा असला, तर आपल्याला क्रिम कलर हवा असतो. नवरा म्हणतो घराची बाल्कनी बेडरुमला हवी... तर आपण म्हणतो, नाही बैठकीला हवी. नवरा म्हणतो महाराष्ट्रीयन जेवण जेवू, तेव्हा आपल्याला बिर्याणी खायची असते. एक जण बजेट बघतो... एकजण फक्त स्टाईल. वयाच्या तिशीत जोडीदाराला समजुन घेणं हे फार क्वचित होतं आणि आक्रमकता जास्त असते.


पण जसजसा काटा वर सरकायला लागतो... तसतशी आक्रमकता कमी व्हायला लागते. आणि कितीही आदळ आपट केली, तरी आहे त्या आजुबाजुच्या गोष्टी कधिच बदलणार नाहीत... हा वस्तुस्थितीचा स्विकार मन हळूहळू करते, नी शांततेच्या मार्गाने जायला लागते.


जेव्हा उत्तरेकडे ही तोच निसर्ग... नी दक्षिणेकडेही तोच निसर्ग हे जीवाला मान्य होतं, तेव्हा "किधर भी चलो... कोई बात नही" ही भावना मनात दृढ होत जाते.


आपल्याला मनःशांती हवी असेल तर "स्वीकार" हा तीन अक्षरी मंत्र फारच प्रभावीपणे काम करतो. आहे त्या माणसांचा, आहे त्या परिस्थितीचा,स्विकार  तो ही आनंदाने. 

आज माझ्या सोबत जे काही होतंय, ते चांगल्या साठीच होतंय, जिंदगी के सफर मे जे जे भेटतय ना... ते माझ्या चांगल्या साठीच भेटतायेत... असं मनावर पक्क कोरलंना... कि मग आपण आहेत्या परिस्थितीतही अत्यानंदात रहातो.


जीवनाकडुन काही अपेक्षाच नाही ठेवली ना... तर मग झाडाला आलेलं फुल पण निर्व्याज आनंद देऊन जातं. जगण्याची उर्जा देऊन जातं.


पण वाटतं तेवढ सोपं नाही बरंका हे.... स्वतः चा "मी" पणा बाजुला ठेवुन अवास्तव अपेक्षा बाजुला ठेवून चालत रहाणं... वाटतं तेवढं नक्कीच सोपं नाही.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...