Hii, सगळे मस्त ना...!
आजचा दिवस सुद्धा खूप छान होता. तुमच्या सगळ्यांना सुद्धा छान गेला असेल अशी आशा. जेव्हा आपल्याला खूप जास्त एकटे वाटत असते, कशाचेतरी खूप वाईट वाटलेले असते, दिवस खूप खराब गेलेला असतो तेव्हा जर तुमच्या जवळ तुमची हक्काची माणसे असतील जी तुमच्या मनातले लगेंच ओळखून आपला मूड बदलत असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात. अशा माणसांना जपा कारण सुखात तर सगळे जग आपल्या सोबत असतात मात्र दुःखात साथ देणारे खूप कमी असतात. हे तर झाल की जर माणसे असतील तर..! पण ह्यापुढे जाऊन जर अशी माणसे नसतील तरी हरकत नाही. तेव्हा आरशासमोर जायचे आणि त्या आरशातल्या आपल्या सगळ्यात जवळच्या हक्काच्या माणसा बरोबर गप्पा मारायच्या मन मोकळे करायचे ok. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment