Saturday, November 25, 2023

सकारात्मक विचार

 Hii, सगळे मस्त ना..! 

आजचा दिवस सुद्धा खूप छान होता. दुपारी मी पायऱ्या चढत होते. तेव्हा मला जाणवले की मला पुढे जायचे असेल तर मागचे पाऊल पुढे आणावे लागत आहे. आणि त्यानंतर ते पुढे आलेले पाऊल मागे येत आहे. आणि पुढून मागे गेलेले पाऊल पुन्हा पुढे येत आहे. मग गर्व कशाचा आहे.

 कोण आज पुढे असेल तर कोणी उद्या. शेवटी प्रवास तर दोन्ही पाऊलांचा चालूच आहे ना. असो त्या पायऱ्या खूप काही शिकवून गेल्या आणि विचार करायला भाग पाडले. ह्या जगात काहीच कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे सत्ता आली यश आले तर गर्व करू नये. आणि पराजय झाला तर खचून जाऊ नये. उद्या परत भेटू अशाच एका विचारासोबत. हसत रहा, खुश रहा.bye


✍️ वसुधा इंगळे.

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...