HII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना मस्तच गेला असेल अशी आशा करते. आपल्या घरचे आपल्याला कधी कधी बोलतात की ह्या सुट्टीत आपण फिरायला जाऊ. आणि जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा काहीतरी कारणामुळे ते राहून जाते. मग आपण रुसतो, फुगतो आणि असे बोलायला लागतो की तुम्ही मला उगच स्वप्ने दाखवली. जे बोलला ते तुम्ही केले नाही. वगैरे वगैरे बघा म्हणजे आपल्या मनासारखे झाले नाही तर आपल्याला कसा राग येतो. मग आपल्या मनात जे ध्येय असते ते पूर्ण होत नाही तेव्हा का राग येत नाही आपल्याला. एकदा प्रयत्न करून पाहिजे ते मिळाले नाही तर राग आला पाहिजे. आणि आपण आधीपेक्षा जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या धर्मात असे बोलतात की प्राण जाये पण वचन ना जाये. मग स्वतःला जर आपण वचन दिले असेल की ह्या वर्षाअखेर माझी ही ही स्वप्ने काहीपण करून पूर्ण झाली पाहिजेत. तर ते आपण स्वतःला दिलेले वचन काहीपण करून पूर्ण केले पाहिजेच. तुम्ही सगळे नक्कीच तुमची ध्येय पुर्ण कराल अशी आशा. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.BYE🦋
✍️वसुधा इंगळे.