Sunday, January 29, 2023

वपु काळे

 संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधनं ही वयानुरूप आणि काळानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही.


पण संसार टिकतो तो कसा ? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होत, तेव्हा घर उभं राहतं


✒️ वपु काळे | वपुर्झा

रतनजी टाटा


 *“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."*


जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला ,  ती आठवण सांगाल का"?


रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."


पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.


मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.


त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.


चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.


पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”


मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.


मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."


वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?


*कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

Saturday, January 28, 2023

सामाजिक नीतिमत्ता

 पहिल्या बायकोला मुलं होत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी दुसरी बायको केलेली आणि दोघी सोबत राहत असलेली उदाहरणं पाहिली,

काही ठिकाणी तर पहिल्या बायकोच्या बहिणी सोबत सुद्धा नवा संसार थाटलेला पाहिल आहे.

आणि हो आपला समाज हे सगळं मोठ्या मनाने स्वीकारतो..

बरेचदा तर बायकोशी पटत नाही म्हणून सुद्धा दुसरी करतात. म्हणजे बघा स्त्री ला काय किंमत उरली यावरून ???

याच्या उलट जर हेच कारनामे एखाद्या स्त्री ने केले, दोन-दोन नवरे एकाच घरात ???

हाच समाज तोंडात शेण घालेल ना??

स्त्री म्हणजे नेमकं काय आहे ?खेळणं असत का???

आनी असल्या पुरुषांना मात्र समाज मानाने जगायला देतो???


तेव्हा कुठे जाते सामाजिक नीतिमत्ता ??

Friday, January 27, 2023

काय चाललंय

 

काय चाललंय या जगात काहीच कळत नाही...

माणसाचं माणुसकीशी गणित कधीच का जुळत नाही...

आजकाल रक्ताच नातं कधीच आपलं का वाटतं नाही..

जे जवळ असतं त्याचं मोलचं कोणाला नसतं,

अवाक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचं मात्र भलतच वेड पप्रत्येकाला असतं...

लांबच्या गोष्टीकडे बघताना जवळच्या गोष्टीकडे कधी लक्षच नसतं,

उद्याच्या चिंतेत आज हरवून बसतो याचं कोणाला भानच नसतं,

सगळं जवळ असूनही माणसाला समाधान मात्र कधीच नसतं...

हे सगळं असं का होतं माहित नाही...

काय चाललंय....या जगात काहीच कळत नाही..


✍️वसुधा इंगळे

विस्मरण

 मॅक्डोल्ड्स मध्ये गेलो🥰 छान फोटो आणि व्हिडिओ काढले, नवरोबा चक्क पाच दिवसानी भेटले होते.... आनंद अगदी ओसंडून वाहत वैगेरे होता, आणि खान्यातच इतके मंत्रमुग्ध झालो की एक ऑर्डर खाऊन झाली🤣, दुसरी ऑर्डर केली अहोनी....


खा बाबा एकदाच खा....परत सोमवार पासून मी गायब असेल तुझे लाड तरी करून घेऊ अस म्हणत. दुसरी ऑर्डर केली🥰🤣


इकडे तिकडे बघून झालं, कॉमेंट पास करून झाल्या, हसून झालं, गप्पा झाल्या, थोडी (थोडीच करते) माझी पाच दिवसाची बडबड होती,ती करून झाली, काही गोष्टी सांगायच्या होत्या, काही विचारायच्या होत्या. त्या पण झाल्या...... 


दुसरी ऑर्डर पण खाऊन झाली, आता गर्दी वाढायला लागली, म्हटलं जाऊ या आता घरी....घरी निघालो.


 चक्क चार दिवसानी आठवल की आपण कार्ड तर तिकडेच विसरून आलो आहोत, आणि चार दिवसांनी ते घेऊन आलो🤣🤣🤣


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...