Tuesday, January 30, 2024

ध्येय

 

HII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना मस्तच गेला असेल अशी आशा करते. आपल्या घरचे आपल्याला कधी कधी बोलतात की ह्या सुट्टीत आपण फिरायला जाऊ. आणि जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा काहीतरी कारणामुळे ते राहून जाते. मग आपण रुसतो, फुगतो आणि असे बोलायला लागतो की तुम्ही मला उगच स्वप्ने दाखवली. जे बोलला ते तुम्ही केले नाही. वगैरे वगैरे बघा म्हणजे आपल्या मनासारखे झाले नाही तर आपल्याला कसा राग येतो. मग आपल्या मनात जे ध्येय असते ते पूर्ण होत नाही तेव्हा का राग येत नाही आपल्याला. एकदा प्रयत्न करून पाहिजे ते मिळाले नाही तर राग आला पाहिजे. आणि आपण आधीपेक्षा जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या धर्मात असे बोलतात की प्राण जाये पण वचन ना जाये. मग स्वतःला जर आपण वचन दिले असेल की ह्या वर्षाअखेर माझी ही ही स्वप्ने काहीपण करून पूर्ण झाली पाहिजेत. तर ते आपण स्वतःला दिलेले वचन काहीपण करून पूर्ण केले पाहिजेच. तुम्ही सगळे नक्कीच तुमची ध्येय पुर्ण कराल अशी आशा. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.BYE🦋

✍️वसुधा इंगळे.

Friday, January 26, 2024

26 january

Hi, सगळे मस्त ना..!! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना मस्त गेलाच असेल अशी आशा करते. आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी खूप जणांनी आपले प्राण गमावले. आत्ता सुद्धा जवान आपल्याला सुखाने झोपता यावे म्हणून डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देत आहेत. पण वाईट ह्याचे वाटते की मुलांना विचारले की तुमचे रोल मॉडेल कोण आहे. तर ते मोठ्या हुशारीने मूव्ही मध्यल्या हिरोंचे नाव घेतात. रीलस आणि रियल मधला फरकच आजकाल कोणाला दिसत नाहीये. चला तर सुरुवात आपल्यापासून करू real hero आहेत त्यांना त्यांचा मान देऊया. आपल्या देशाचे नाव उंच करण्याचा प्रयत्न करूयात. उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

Sunday, January 21, 2024

वाईट गोष्टी मधून चांगल काही तरी

 

Hiii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप सुंदर होता. तुम्हाला सगळ्यांना सुध्दा आजचा दिवस छान गेला असेल अशी आशा करते. लहानपणी म्हणजे जेव्हा मी चौथी मध्ये होते, तेव्हा वर्गात आम्हाला मोजून 10 ते 12 सुविचार शिकवले होते. त्यात ते आपले नेहमीचेच नेहमी खरे बोलावे वगैरे वगैरे. एक दिवस आमच्या मॅडम क्लास मध्ये आल्या आणि सगळ्यांना ओळीने एक एक सुविचार विचारायला सुरुवात केली. तेव्हा झाल असं ज्या दिशेने ते विचारायला सुरुवात केली नेमके त्याच्या विरुद्ध दिशेला मी बसले होते, माझा नंबर शेवटीच येणार होता. काही मुलांनी सांगितले काहींनी नाही असे करत करत माझा जेव्हा सांगण्याचा नंबर आला तेव्हा आम्हाला शिकवलेले सगळेच सुविचार संपून गेले. आणि मी काहीच सांगू शकले नाही. तेव्हा माझ्यासहित अजून ज्यांनी सांगितले नाही अशा 22 जणांना 100 उठाबश्या काढाव्या लागल्या होत्या. तेव्हा माझ्या पायापेक्षा पण जास्त काहीतरी दुखावले होते ते म्हणजे माझे मन. माझ्या मनाला वाटत होते की तुला साधा चांगला एक विचार बोलता आला नाही. असो पण त्या दिवशी मी ठरवले होते. जिथे आज मला काहीच सांगता आले नाही म्हणून मी शिक्षा भोगली, ती एक दिवस नक्कीच उठता बसता चांगल्या विचारांचे भांडार घेऊन फिरेल. आणि हो तिच मी आहे जी आत्ता 1 सुविचार काय तर सुविचारांचे पुस्तक लिहू शकते. प्रयत्न करत रहा. ह्या जगात अशक्य काहीच नाही. ज्यात आपण zero असू त्यात आपण एक दिवस hero पण होऊ शकतो. विश्वास ठेवा. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

Monday, January 15, 2024

यशाचा पतंग

 

Hiii, सगळे मस्त ना...!! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त आणि सुंदर होता. तुम्हांला सगळ्यांना सुद्धा आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते. आज संक्रांत होती. सगळीकडे मस्त उत्साह होता. सगळीकडे पतंग उडताना दिसत होते. बघा ना पतंगाची डोर आपल्या हाती असते. आपण त्याला जेवढे आकाशात उंच उडवू तेवढा तो उंच जातो. म्हणजे किती पतंग उंच उडवाईची हे आपल्या हातात आहे. तसेंच आयुष्यात आपल्याला आपले ध्येय किती उंच ठेवायचे आहे आणि पूर्ण करायचे आहे ह्याची डोर आपल्या हातातच आहे. तुमच्या सगळ्यांचा यशाचा पतंग उंच जावो की अपेक्षा. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️ वसुधा इंगळे.

Sunday, January 14, 2024

 HIII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर सूर्य तुम्हाला कधी बोलला आहे का मी रोज तुम्हांला सूर्य प्रकाश देतो. पण त्याच्या बदल्यात तुम्ही तर मला काहींच देत नाही. किंवा सूर्यच नाही तर निसर्गाने खूप काही आपल्याला दिले आहे. पण त्यांनी बोलून दाखवले नाही. निसर्गाचा प्रकोप खुप वेळा झाला पण निसर्गाने त्याचा राग शांत करून आपल्याला खूप काही दिले आणि तो अजून देतोय. मग आपण का छोट्या छोटया गोष्टी लक्षात ठेवायच्या की मी ह्याचे हे केले ते केले पण त्याला जाणीव नाही वगैरे वगैरे. मनापासून करायचे सगळे कशाचीच अपेक्षा न ठेवता. कारण अपेक्षांचा डोंगर कधीच संपत नसतो. 

✍️ वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...