आज पुन्हा एक सुंदर आणि प्रसन्न असा दिवस. तुम्ही सगळे मस्त असालच हो ना..! आपण खाताना तोंडात आलेली मिरची काढून टाकतो. तुम्ही म्हणाल हे काय सांगतेय ही, तर मला हे सांगायचे आहे; की आपण जसं खाताना जे नको आहे ते बाजूला टाकतो आणि बाकी जे आवडते, जिभेला चांगले वाटते ते खातो. तसंच आयुष्यात पण करायचे आहे. कशाला कोणाच्या बद्दलची आपल्याला न आवडणारी बाजू लक्षात ठेवायची. ठेवायचे आहेच ना तर त्या माणसातले चांगले गुण लक्षात ठेवूयात ना. आणि मी ह्या मताची आहे की कोणताच माणूस पूर्णपणे वाईट नसतो, किंवा आपल्याला त्याचे ते वागणे पटले नाही म्हणजे तो माणूस वाईट आहे असे होत नाही. आज मी हेच चांगले काम करणार आहे.
माझ्या आयुष्यातल्या सगळ्या माणसांचे चांगले वागणे त्यांच्यातले चांगले गुण आठवणार आहे. हे केले की किती छान दिसेल ना सगळे जग. आणि खरंच आहेच हो जग सगळे सुंदर पण ते बघायला आपले डोळे सुंदर असायला हवे ना. आजसाठी एवढेच. उद्या परत भेटूया. मस्त रहा खुश रहा आणि हसत रहा. Bye
✍️वसुधा इंगळे.
No comments:
Post a Comment