समोरच्या माणसाला आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसतानाही किती लवकर जज करत असतो.ही अशीच आहे तशीच दिसते, तो असाच असणार, ही अशीच वागते वगैरे वगैरे. सोशल मिडियाने जजमेंट पास करणारा मेढरांचा एक कळप तयार केलेला आहे. जिथं गोष्टींचं आकलन नकरता प्रत्येकच जण गोष्टीबद्दल मत बनवू लागला आहे किंवा अगदीच मत मांडू लागला आहे..
आपल्या शाळेत आपण वेगळे असतो, मग कॉलेजात अजून बदलतो, तसेच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणूस बदलत राहतो. पण त्या त्या टप्प्यावर भेटलेल्या माणसांच्या मनात आपली प्रतिमा तिच राहते. वेळेनुसार माणूस बदलत असतो. हे कुणाला तितकंसं पचनी पडणारं नसतं किंवा तेवढा विचार करण्याइतपत पाहिजे असणारा समजूतदारपणा कदाचित अस्तित्वातच नसवा.
आता हे कधी बदलेल का ? तर हे कधी बदलेल की नाही माहीत नाही. पण आपण या लोकांच्या जजमेंट्सना नक्कीच दुर्लक्षित करू शकतो.
✍️वसुधा इंगळे.


No comments:
Post a Comment